HW News Marathi
राजकारण

मोहम्मद शमी यांची पत्नी हसीन जहाँ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज मोहम्मद शमी यांची पत्नी हसीन जहाँ यांनी आता राजकारणात प्रवेश केला आहे. हसीन जहाँ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वादामुळे मोठी खळबळ माजली होती. हसीन जहाँ यांनी पती मोहम्मद शमीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यावेळी हसीन जहाँ यांच्या या आरोपांमुळे चर्चांना मोठे उधाण आले होते. हसीन यांनी मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

हसीन जहाँ यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे आता उलटसुलट चर्चांना उधाण येणार आहे. हसीन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हसीन जहाँ यांनी मोहम्मद शमीवर विवाह बाह्य संबध असल्याचा आरोप देखील केला होता. यासोबतच त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप केल्यामुळे शमीला चौकशीला सामोरे जावे लागले होते. बीसीसीआय आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून शमी यांची चौकशीही चौकशी करण्यात आली होती. बीसीसीआयच्या चौकशीत मात्र त्यांना क्लिन चीट मिळाली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्तांधारीमध्ये धक्काबुक्की; अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Aprna

“वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”, मनसेचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंना टोला

Aprna

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ की ज्योतिरादित्य नक्की कोण होणार मुख्यमंत्री

News Desk
राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करणार ?

News Desk

मुंबई | “भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची तयारी केली असून येत्या २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता आहे. ही भाजपची रणनीती आहे. अशा प्रकारे धक्का देऊन पुन्हा सत्तेवर येण्याचा भाजपचा विचार आहे”, असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्याचप्रमाणे लोकसभा- विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यासाठी तयार रहावे”, असे आदेश अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतांच्या राजकारणासाठी आश्‍वासने दिली जात आहेत. आणखीही मोठ्या घोषणा दिल्या जातील. हा चुनावी जुमला आहे. सध्या काँग्रेसक मतांचे विभाजन टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकरांनी खासदार व्हावे, ही कॉंग्रेसची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Related posts

नितीन गडकरींचा पराभव निश्चित, काँग्रेसचा दावा

News Desk

लोकशाही व संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा! – नाना पटोले

Aprna

जे दिलेली आश्वासने पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही !

News Desk