HW News Marathi
राजकारण

नाव छत्रपतींचे, काम अफजलखानाचे

विरार | पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे राजेंद्र गावित यांचा प्रचार करण्यासाठी भाजपाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी विरार पुर्व येथे उपस्थित राहिले होते. यावेळी घेतलेल्या सभेत योगींनी सेनेवर आगपाखड केल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात करताना ते म्हणाले, ‘सर्वांना माझा नमस्कार, मला विरारमध्ये तुमच्यात येऊन फार आनंद होतोय’ तसेच महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशचा जुना संबंध आहे. महाराष्ट्र शिवाजी महारांनी सत्ता प्रस्थापित केली तेव्हा त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उत्तर प्रदेशच्या काशीतून पुरोहित गागाभट्ट आले होते. असे म्हणत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात फुट पाडणारे लोक हिताचे काम करत नाहीत. नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे घेतात आणि काम मात्र अफजल खानासारखे करतात असे म्हणत योगींनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.

सध्याच्या राजकारणात असलेली शिवसेनेची भुमिका पहाता सर्वात जास्त दुःख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होत असेल. राजकारणात बाळासाहेबांनी कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही परंतु आज शिवसेना पहिल्यासारखी राहिली नाही. स्वतःच्याच भूमिकेची शिवसेना चेष्टा करत आहे असे वक्तव्य यागी आदित्यनाथ यांनी विरारमध्ये भाषणा दरम्यान केले.

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ आवर्जून वनगा कुटुंबीयांविषयी म्हणाले, भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजप कडून त्यांच्या कुटुंबाला योग्य तो न्याय आम्ही दिला असता. शिवसेनेला या प्रकरणात पडण्याची गरज नव्हती. वनगा आणि भाजप हा भाजपाचा अंतर्गत विषय होता. तसेच कटू परिस्थितीत सरकार कसे चालवावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असे म्हणत योगी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक देखील केले.

सध्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नक्की काय निकाल येणार याकडे सर्वांचेचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसमधून भाजपात आलेले राजेंद्र गावित आणि भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास गावित निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत जणता कुणाला कौल देणार सत्ता कुणाची येणार हे पहाणे येत्या काळात महत्वाचे ठरणार आहे. भाजप शिवसेनेने प्रचारात ताकद पणाला लावल्याचे चित्र सध्या पालघर मध्ये पहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तुम्ही कधी आमदार फोडलेत का?, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या…

Aprna

नवनीत राणा-भाजपमधील संघर्ष चिघळणार ?

News Desk

पंकजा मुंडे यांनी गुणरत्न सदावर्तेंची केली कानउघडणी

Manasi Devkar
मुंबई

कल्याण,कुर्ला व ठाणे मुंबईतील तीन अस्वच्छ रेल्वे स्थानक

News Desk

मुंबई | सर्वात जास्त वर्दळ असलेल्या रेल्वे स्थानकांना आता अस्वच्छ स्थानकाचा दर्जा मिळाला आहे. भारतीय रेल्वेने ११ ते १७ मे या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून मुंबईतील कल्याण, कर्ला आणि ठाणे अस्वच्छ रेल्वे स्थानक असल्याची नोंद झाली आहे.

भारतीय रेल्वेने दहा अस्वच्छ स्थानकांची यादी जाहीर केली. यात. अस्वच्छतेच्या यादीत कानपूर रेल्वे स्थानकाचा पहिला क्रमांक मिळाला आहे. या यादीत कल्याण तिस-या स्थानी, कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस पाचव्या स्थानी आणि ठाणे हे आठव्या स्थानी आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात दिवसाला अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. या सर्वेक्षणा दरम्यान रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांच्या ट्रेन आणि स्थानकावरीस सुविधा सुधारण्यासाठी प्रवाशांकडून अभिप्राय मागितला होता. प्रवाशांच्या मोबाईल नंबरवर फोन करून त्यांच्या अभिप्राय मागविले होते.

प्रवाशांना तिकीट बुकिंगच्या वेळी दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून ट्रेन व स्थानकातील स्वच्छता, खाण्याची सोयी, एसी, अन्न-पदार्थ आणि ट्रेनमधील बिछीने अशा अनेक मुद्दयांवर अभिप्राय मागितला होता. त्या सर्वेक्षणानंतर अस्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी जाहीर केली.

 

 

Related posts

“कसबा विजयानंतर काँग्रेस राज्य आणि देश जिंकू; परंतु…”, मुख्यमंत्र्यांची सभागृहातून टीका

Aprna

मेजर कौस्तुभ राणे शहीद, मीरारोडवर शोककळा

News Desk

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपत घोषणाबाजी

News Desk