HW News Marathi
राजकारण

मोदींच्या राज्यात जनतेला ना राम मिळाला, ना रोजगार !

मुंबई | “मोदींच्या राज्यात जनतेला ना राम मिळाला, ना रोजगार. नरेंद्र मोदी जर पुन्हा सत्तेत आले तर हिंदुस्थान संपला म्हणून समजा”, असे वादग्रस्त वक्तव्य माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला आहे. “मोदींनी कायमच केवळ खोट्या गोष्टी सांगून देशातील जनतेची दिशाभूल केली. त्यांनी ज्या ज्या कामांची घोषणा केली ती सर्व कामं त्यांनी अर्धवट सोडली आहेत”, अशी टीका देखील सिद्धू यांनी यावेळी केली आहे. सिद्धू हे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“पंतप्रधान मोदींमुळे व्यापार संपला आहे. नरेंद्र मोदी जर पुन्हा सत्तेत आले तर हिंदुस्थान संपला म्हणून समजा३ मोदी देश सोडून फरार झाले आणि चौथा खोटे बोलत आहे. मोदींच्या राज्यात जनतेला ना राम मिळाला, ना रोजगार”, अशी बोचरी टीका नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्याच खोट्याच्या लाटेत बुडणार आहेत, असेही सिद्धू यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणूनच सीबीआयच्या संचालकांना हटविले, राहुल गांधींची मोदींवर टीका

swarit

पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौ-यावर

News Desk

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Aprna