HW News Marathi
राजकारण

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आता एक महिना पूर्ण होण्यास आला असला तरीही अद्याप राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. येत्या सोमवारी म्हणजे ३० डिसेंबर रोजी राज्याचा हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती मिळतेय. दरम्यान, महाविकासआघाडीच्या या खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर आज (२७ डिसेंबर) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला एक सल्ला दिला. “किमान गृहमंत्रीपद तरी राष्ट्रवादीला देऊ नका. गृहमंत्रीपद देखील राष्ट्रवादीला दिलंत, तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील”, असा चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.

“चंद्रकांत पाटील यांच्या हातातली सत्ता गेल्यामुळे त्यांचे दुःख मी समजू शकतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कावळ्यांच्या शापाने कधी गाय मरत नाही”, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्याचप्रमाणे, महाविकासआघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबाबत देखील अजित पवार यांनी भाष्य केले आहे. “कोणीही शेतकरी कर्जमाफीवरुन श्रेयवाद करु नये. हे महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्याचे ते श्रेय आहे”, असे म्हणत यावेळी अजित पवार यांनी पोस्टरबाजी करणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांचा सल्ला काय ?

“काय करायचे हे उद्धव ठाकरेंनी ठरवावे. पण, खूप वर्ष आम्ही एकत्र काम केले आहे. म्हणून माझे त्यांच्यावर व्यक्तिशः प्रेम आहे. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला देऊ नका. तुम्ही तुमच्या हातामध्ये काहीच ठेवत नाही. गृहमंत्र्यांकडे तर सगळेच असते. तुम्ही सगळेच देऊन टाकले. तुम्ही जर गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला दिले. तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील”, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसची सातवी यादी जाहीर, जालन्यातून विलास औताड यांना उमेदवारी

News Desk

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारची सहानुभूती नाही! – जयंत पाटील

Aprna

सरकार बोलण्यात ऑनलाईन,कामात ऑफलाईन!: खा. अशोक चव्हाण

swarit