HW News Marathi
राजकारण

राजकारणातही नौटंकी होत असते !

मुंबई। देशात आज अतिशय वेगळ वातावरण पाहयाल मिळत आहे. ज्या प्रसारमाध्यमांनी लोकसभा मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर केले ते सर्व प्रसारमाध्यमे सरकारच्या हातात आहेत. त्यामुळे २३ तारखेला येणारे निकाल फार वेगळे असतील असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पावर यांनी काल (१९ मे) जाहीर झालेल्या विविध संस्थांच्या एक्झिटपोलवरुन मोदी सरकारवर निशाना साधला आहे. आज (२० मे) मुंबईत रमजानच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

काल पासून मला आमच्या अनेक सहकाऱ्यांचे फोन आले आणि त्यांनी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आहे. आपला देशाला कुठल्या मार्गावर जायचे आहे आणि कुठल्या मार्गावर जात आहे असे प्रश्न एक्झिट पोलवरुन उपस्थित केले आहे. मी त्या सर्वांना सांगितले की, ज्या लोकांच्या हातात देशाचा मीडिया आहे. त्यांनी तसे वाटत आहे मात्र २३ तारखेला येणारा निकाल फार वेगळा असेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आज ओयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि पक्षाचे अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते.

“निवडणूक होणार, कोणी जिंकणार तर कोणी हारणार हे होतच राहणार परंतु मी कधी पाहिले नाही की, मतदान पार पडल्यानंतर देशाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीचे राजधानी सोडून हिमालायमध्ये जावून बसले. आणि देशातील जनतेला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. असे म्हणत यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराखंड दौऱ्यावरही जोरदार निशाना साधला.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणूनच सीबीआयच्या संचालकांना हटविले, राहुल गांधींची मोदींवर टीका

swarit

“…तब्बल दिडशे बैठका घेतल्या”, मंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

Aprna

इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा !

News Desk