HW News Marathi
राजकारण

दुसरा मोदी तयार होऊ नये म्हणून मी माझे बोट आता कोणाला धरु देत नाही !

दौंड | “मी माझे बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेतोय,” अशा खोचक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली. शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात प्रमुख कार्यकर्त्यांना यवत येथे मार्गदर्शन करताना पवार बोलताना म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, माझे बोट धरून राजकारणात येणार्‍या मोदींनी वर्ध्याच्या सभेत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका केली. पवार कुटुंबात भांडणे आहेत, असे ते म्हणाले. राजकारणात वैयक्‍तिक टीका करू नये, हा अलिखित नियम आहे. मला दिल्लीत मोदी भेटल्यावर त्यांना मी विचारीन की, माझ्या घरात भांडणे आहेत, हे तुम्हाला कसे कळले. माझे घर भरलेले आहे. तुमचे घर कसे आहे.

मोदी सरकार २०१४च्या निवडणुकीत विकासाच्या मुदद्यावरून सत्तेत आली. आता मोदी सरकार विकासाच्या मुद्द्या सोडून हिंदूत्वाचा मुद्द्यावरून राजकारण करत आहे. तसेच ‘मोदी आमच्या आघाडीला मिलावट आहे, असे म्हणत मोदी म्हणाले. आम्ही काही पक्ष एकत्र आलो ही गोष्ट खरी आहे. देशभरात आम्ही सगळे मिळून २६ पक्ष आहोत. पण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे एकूण ३६ पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे मोदी जर आम्हाला मिलावट म्हणत असतील तर ते महामिलावट आहेत’, अशी बोचरी टीका यावेळी शरद पवार यांनी केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवीन वर्ष मोदी मुक्त भारताचे जाओ, काँग्रेसच्या सर्व योजानांचे नाव बदलून सरकार चालविले

News Desk

प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्या, काँग्रेसची मागणी

News Desk

लोकसभेत काही ठिकाणी राष्ट्रवादीने आघाडीविरोधात काम केले !

News Desk