HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीने अहमदनगरच्या १८ नगरसेवकांना केले बडतर्फ

मुंबई | अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये पक्षादेश डावलून भाजपला मतदान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. तर जिल्हाध्यक्षांना देखील अध्यक्षपदावर काढून टाकण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षाने काँग्रेसला पक्षाला मतदान करण्याचा आदेश दिलेला असताना तो डावलण्यात आला. त्यानंतर पक्षाच्यावतीने त्यांना सात दिवसांत आपली बाजू मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटीसीद्वारे दिली होती. परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींना कोणती कल्पना दिली नाही किंवा घडलेल्या घटनेबाबत कोणताही खुलासा न केल्याने त्यांनाही पदावरून काढून टाकण्यात आले आहे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनमोहन सिंग यांनी राज्यसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज

News Desk

भीमा-कोरेगाव येथे ३० डिसेंबरला आझाद यांची जाहीर सभा

News Desk

अंबाजोगाईतील डीवायएसपींची बदली, तर ग्रामीणचे पीआय सस्पेंड; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna