HW News Marathi
राजकारण

शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नाही, पुढे कसे जाणार ?

मुंबई | राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात महायुतीचे दोन्ही मोठे पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेतील संघर्ष आणि राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणाच्या शक्यतांबाबत विधानसभेच्या निकालानंतरपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील याच राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (४ नोव्हेंबर) दिल्लीत नुकतीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दरम्यान, सोनिया गांधींसोबतची भेट संपल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली आहे. “सोनिया गांधींना आपण राज्यातील राजकीय स्थितीबाबत माहिती दिली. सत्तास्थापनेबाबत शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेली नाही. त्याचप्रमाणे, आपल्यात याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही”, अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे आपण उद्या (५ नोव्हेंबर) मुंबईतील नेत्यांशी चर्चा करू, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती सोनिया गांधींना दिली
  • शिवसेनेकडूनही राष्ट्रवादीकडे प्रस्ताव नाही, चर्चा देखील नाही
  • शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय नाही
  • प्रस्ताव आल्याशिवाय पुढे कसं जाणार ?
  • भाजपला राज्यातील जनतेने बहुमत दिले आहे
  • भाजपने सरकार स्थापन करावे
  • सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडा आमच्याकडे नाही
  • सत्ता स्थापनेबाबत आमचे शिवसेनेशी बोलणं झालेलं नाही
  • संजय राऊत यांना मी नेहमीच भेटतो.
  • उद्या (५ नोव्हेंबर) मुंबईतील नेत्यांशी चर्चा करू
  • त्यानंतर पुन्हा एकदा सोनिया गांधींची भेट घेणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममतांचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या महिलेची सर्वोच्च न्यायालयाने केली सुटका

News Desk

वनगांची उमेदवारी अद्याप प्रतिक्षेत

News Desk

इव्हीएम मशीनचा गैरवापर होतोय, नवाब मलिकांचा आरोप  

News Desk