HW News Marathi
राजकारण

सावधान ! काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी !

मुंबई | “महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी,” अशा मार्मिक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर भाजपवर टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज (१२ मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सुजय भाजप प्रवेशानंतर “महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! -जनहितार्थ जारी,” असे ट्विट आव्हाडांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या जागेसाठी सुजय यांनी चर्चा केल्या होत्या. परंतु या चर्चेमधून सुद्धा काही फळ न मिळाल्यानंतर शेवटी सुजय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींनी ‘छोट्या’ भावाच्या हातात हात घालून घेतली मंचावर एन्ट्री

News Desk

शत्रुघ्न सिन्हांची पत्नी पूनम सिन्हांचा सपामध्ये प्रवेश, लखनौमधून उमेदवारी

swarit

आम्हाला बी टिम म्हणून हिणवणारे आता भाजपचे गुलाम !

News Desk