HW News Marathi
राजकारण

जगासमोर देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी एअर स्ट्राईकचे पुरावे देणे आवश्यक !

मुंबई | “आम्ही फक्त आमच्यापुढे एक लक्ष्य ठेऊन ते लक्ष्य पूर्ण करतो. आम्ही केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले किती किंवा जिवीतहानी झाली ? हे मोजणे आमचे नाही तर सरकारचे काम आहे”, असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनुआ यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर “भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या कारवाईत खात्मा झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत धनोआ यांनी केलेले वक्तव्य हे सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे”, असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

“पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहिले. म्हणूनच भारतीय वायू दलाच्या कारवाईला देखील पाठिंबा मिळाला. मात्र, आता जर या कारवाईवरच प्रश्न उपस्थित होत असतील तर ते देशाच्या प्रतिष्ठेसाठी हानिकारक आहे. सरकार वायू दलाची प्रतिष्ठा राखण्यास अपयशी ठरले आहे”, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

त्याचप्रमाणे “आम्ही हल्ले करतो हेच दाखवायचा हा एक प्रयत्न असेल तर त्याची काहीच गरज नव्हती. कारण, यापूर्वीही ते दाखवून दिले आहे”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. “वायुसेनेने आपले कर्तव्य चोख बजावले आहे. त्यामुळे आता जर आपल्याला संपूर्ण जगासमोर आपली प्रतिमा टिकवून ठेवायची असेल तर वायू दलाच्या कारवाईचे पुरावे जगासमोर ठेवणे आवश्यक आहे”, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी देखील एअर स्ट्राईकचे पुरावे, फोटोज देण्याची मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

EXIT POLL : मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये कडवी टक्कर

News Desk

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव! – मुख्यमंत्री

Aprna

इम्रान खान पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान, आज घेतली पंतप्रधान पदाची शपथ

News Desk