HW News Marathi
राजकारण

पक्षांच्या रात्रीच्या प्रचारामुळे लोकांना त्रास, निवडणूक आयोगाने घातली बंदी

नवी दिल्ली | निवडणुकीच्या आचारसंहितेनुसार सर्व राजकीय पक्षांचा प्रचार रात्री १० वाजल्यानंतर थांबविण्यात येतो. परंतु त्यानंतर इतर अनेक पद्धतीने उमेदवारांचे प्रचारकार्य सुरूच असते. उमेदवार दिवसातील थोडाही वेळ ते वाया घालवीत नाहीत असेच चित्र पाहायला मिळते. त्यामुळे हा त्रास थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या या रात्रीच्या प्रचारकार्यावर बंदी घातली आहे.

रात्रीच्या वेळेत फोन, एसएमएस, व्हॉट्सऍपद्वारे उमेदवारांचा हा प्रचार सुरूच राहत असल्याने लोकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी ही बंदी निडणूक आयोगाचे सचिव एन. टी. भुतिया यांच्याकडून राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचे काटेकोर पद्धतीने पालन करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

लोकांना तक्रार नोंदविण्यासाठी ‘सी व्हिजिल ऍप’

मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी ‘सी व्हिजिल ऍप’ सुरु केले आहे. आचारसंहितेच्या काळात रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने वा उमेदवाराने प्रचारासाठी फोन किंवा एसएमएस केला तर त्याची तक्रार करण्यासाठी ‘सी व्हिजिल ऍप’ सुरु करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही !

News Desk

मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, ३० मे रोजी शपथविधी सोहळा

News Desk

विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली?

News Desk