HW News Marathi
राजकारण

मुलुंडमध्ये भाजपच्या चिन्हावर शाई लावल्याने गोंधळ

मुंबई । मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघासाठी आज (२९ एप्रिल ) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघातील मुलुंड पूर्वेकडील भागात असलेल्या ‘होली एन्जल स्कूल’ येथील मतदान केंद्रात आज सकाळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. होली एन्जल स्कूल मतदान केंद्रातील ईव्हीएमवर भाजपच्या चिन्हासमोर शाई लावण्यात आल्याचा प्रकार मतदाराच्या निदर्शनास आला. यानंतर मतदारांनी शंका उपस्थित करत मतदान केंद्रात गोंधळ घातला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी ईव्हीएम बदलण्याची मागणी केली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर दुसरे ईव्हीएम लावण्यात आले आणि मतदान पूर्ववत सुरू झाले. या गोंधळामुळे या मतदान केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया तासभर बंद ठेवण्यात आली होती. ईशान्य मुंबईत भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे किरीट यांचे तिकीट कापत मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदार संघात मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील अशी दुहेरी लढत पहायला मिळत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘तिरडी आंदोलन’ पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीचा निषेध

News Desk

न्या. गोयल यांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदावरून त्वरित हटवा

News Desk

पुलवामा हल्ला नसून ती तर ‘दुर्घटना’

News Desk