HW News Marathi
राजकारण

राज्यात शेतक-यांसाठीच्या कोणत्याही योजनांवर प्रभावी काम झालेले नाही !

मुंबई | “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा गाजावाजा करतात कि या ५ वर्षात भाजप सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारण योजना राबवल्या. तसे असले तर राज्यात दुष्काळस्थिती आलीच कशी ? शेतक-यांसाठीच्या कोणत्याही योजनांवर प्रभावी काम झालेले नाही. त्याउलट शेतकरी संकटात सापडले आहेत”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील तब्ब्ल २५ हजारहून अधिक गावे दुष्काळग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना जलयुक्त शिवारसारख्या जलसंधारण योजनांची केवळ गाजरे दाखविली आहेत, असा आरोपही राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

“आम्ही अनेक योजना आणल्या ज्यावर १०० टक्के काम झाल्याचा गाजावाजा सरकारकडून करण्यात येतो. मात्र, त्यांपैकी कोणतीही योजना प्रभावीपणे राबविली गेली नाही. भाजप सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. या योजना जर प्रभावीपणे राबविल्या गेल्या असत्या तर राज्यात दुष्काळस्थिती कशी निर्माण झाली असती ?”, असा सवाल शरद पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी (४ मे) मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्यातील दुष्काळावर चर्चा केली आहे. राज्यातील भीषण दुष्काळस्थिती लक्षात घेत उपाययोजना करण्यात सरकारला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून लोकसभेसाठी सुरु असलेली आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेकडून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा देऊन सेना-भाजपला प्रेमाचा चिमटा

News Desk

उभ्या आयुष्यात इतका भित्रा, कमकुवत पंतप्रधान पाहिला नाही !

News Desk

चंद्राबाबू नायडू नंतर ममतानेही सीबीआयला रोखले

News Desk