HW News Marathi
राजकारण

आता मुंबईचे डबेवाले देखील अयोध्येला जाणार

मुंबई | अयोध्या राम मंदिराचा मुद्दा तापलेला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. याच मोहिमेसाठी आता मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रतिनिधी देखील त्यांच्या सोबत अयोध्येला जाणार आहेत. मुंबईहून मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येला जाणार असून त्यांच्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. याच विशेष रेल्वेने मुंबईचे डबेवाले देखील अयोध्येला रवाना होणार आहेत.

यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या २५ नोव्हेंबरला आपण अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले होते.मुंबईच्या डबेवाल्यांच्या संकट काळात शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे यावली शिवसेना व उध्दव ठाकरे मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनने म्हटले आहे. यासाठी मुंबई डबेवाले असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांचे नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ अयोध्येला जाणार आहे. दरम्यान, त्यांच्या डबे पोहोचविण्याच्या त्यांच्या सेवेत यामुळे कोणताही खंड नसून ही सेवा नियमित सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राबडी देवींच्या घरी CBI चा छापा; काय आहे नेमके प्रकरण

Aprna

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत दया !

News Desk

चोराच्या उलट्या बोंबा

swarit
राजकारण

रामाचा पुतळा उभारण्यापेक्षा मंदिर बांधण्यावर भर द्या, धर्मगुरुंचा योगींना सल्ला

News Desk

नवी दिल्ली | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामाची २२१ फूट उंचीची मूर्ती उभारणार असल्याची घोषणा केली होती. मात्र योगींच्या या मूर्ती उभारण्याच्या संकल्पनेला धर्म संसदेतील साधू-संतांनी विरोध केला आहे. “श्रीरामाचा पुतळा उभारण्यापेक्षा मंदिर बांधण्यावर भर द्या. त्यासाठी प्रयत्न करा आणि हे करत असताना कुठलाही जातीयवाद करु नका”, असा सल्ला योगींना देण्यात आला आहे.

“आधीच देशभरात महापुरुषांचे भरपुर पुतळे आहेत. पुतळे महापुरुषांचे उभारले जातात देवाचे नाही. श्रीराम हे आपले दैवत आहेत. त्यामुळे श्रीरामाचे मंदिर उभारा पुतळा नाही”, असा सल्ला देखील सर्व संतानी योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी २२१ फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीसाठी शरयु नदीच्या किनाऱ्यावरील जागाही निश्चित केली होती. महाराष्ट्रातील मुर्तीकार राम सुतार यांनी बनविलेल्या मुर्तीची प्रतिकृतीची निवड त्यासाठी करण्यात आली आहे.

वाराणसी येथे २५ ते २७ नोव्हेंबर या तीन दिवसांत परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जवळपास १००८ संत-महंतांनी सहभाग घेतला. सध्याची हिंदू संस्कृती, हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार याबाबत या संसदेत चर्चा करण्यात आली. सोबतच राम मंदिर, गंगा नदीचे शुद्धीकरण आणि सनातन धर्म यांसारख्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. याच चर्चेदरम्यान श्रीरामांचा उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याला संसदेतील संतानी विरोध केला.

Related posts

धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा कायम राहणार !

News Desk

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यावर भडकल्या ममता दीदी

News Desk

शेगावत होणाऱ्या सभेत सोनिया गांधी उपस्थित राहणार; उद्धव ठाकरे हजेरी लावणार?

Aprna