HW News Marathi
राजकारण

इंग्रजांना जाऊन ७२ वर्षे झाली, आता त्यांचे प्रोटोकॉल बंद करा !

राळेगणसिद्धी । इंग्रजांना आपला देश सोडून ७२ वर्षे झाली. आता त्यांचे प्रोटोकॉल बंद करा. लोकशाहीमध्ये सामान्य जनता मालक तर अधिकारी सेवक असतात. अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले पाहिजे. लोकशाहीत शासन व प्रशासन लोकाभिमुख असावे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी (७ फेब्रुवारी) दिलेल्या एका पत्रकात व्यक्त केले आहे.

अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी ४ फेब्रुवारीला अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला होता. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रोटोकॉलचे कारण देत ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. मुख्यमंत्री फडणवीस अण्णा हजारेंच्या भेटीस आले असताना अण्णा हजारेंनी याबाबत नाराजी व्यक्त करत हे प्रोटोकॉल रद्द करण्याची मागणी केली होती.

“इंग्रजांना आपला देश सोडून ७२ वर्षे झाली. तरीही, इंग्रजांचे प्रोटोकॉल्स आजही आहेत. प्रोटोकॉल हा लोकशाहीवरचा आघात आहे. पण हे सरकारला कसे लक्षात येत नाही ? सेवक मालकाची निवेदने घेत नसतील तर हा लोकशाहीचा अपमान आहे”, असे अण्णा म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बजेट’ मतांचेच असले तरी देशातील सगळय़ांसाठी दिलासादायक

News Desk

उदयनराजेंना भाजपची ऑफर?

News Desk

“महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल”, शरद पवारांचा विश्वास

Aprna