HW News Marathi
राजकारण

आता न्यायालय देखील म्हणते ‘चौकीदार चोर है’ !

नवी दिल्ली | “आता सर्वोच्च न्यायालय देखील म्हणत आहे कि राफेल करारात घोटाळा झाला आहे. आता न्यायालयानेच सांगितले आहे कि चौकीदार चोर है. पंतप्रधान मोदींनी आता माझे खुल्या चर्चेचे आव्हान स्वीकारावे” असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणी पुन्हा सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

“आता न्यायालय देखील म्हणत आहे कि चौकीदार चोर है. त्यामुळे आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल प्रकरणी खुल्या चर्चेचे माझे आव्हान स्वीकारावे”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल करार प्रकरणी पुन्हा सुनावणी करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचप्रमाणे पुराव्याखातर दिलेल्या कागदपत्रांवर केंद्राने घेतलेले आक्षेप देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाआघाडीतील सर्वांनाच पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत !

News Desk

पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन; बनावटी राज्यपालांचे फेडले धोतर

Aprna

भाजपचा भ्रमाचा फुगा फुटला…पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवरून अमोल मिटकरींचा भाजपला टोला!

News Desk