HW News Marathi
राजकारण

पंतप्रधानांकडे आता प्रचारासाठी कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत !

नवी दिल्ली | “गंगा शुद्ध करण्याचे आश्वासन देत २०१४ साली मोदी सत्तेत आले. आता २०१९ साली राफेलमधील घोटाळ्यामुळे त्यांना सत्तेतून बाहेर पडावे लागणार आहे”, असा दावा काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी केला आहे. यावेळी नवज्योत सिंह सिद्धू यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपसह पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांकडे आता प्रचारासाठी कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत. त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही सिद्धू यांनी यावेळी केला आहे. ते आज (६ मे) पत्रकार परिषदेत बोलत होते.

“२०१४ साली पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला ३०० पेक्षाही अधिक आश्वासने दिली. त्यावेळी मोदी म्हणाले होते कि, ना खाऊंगा, ना खाने दुंगा. परंतु, त्यांच्या सत्तेच्या काळात सर्व काही त्या उलटच झाले. मोदींनी आपले कोणतेही आश्वासन पाळले नाही. त्यामुळेच गंगा शुद्ध करण्याचे आश्वासन देत २०१४ साली सत्तेत आलेल्या मोदींना आता २०१९ साली राफेलमधील घोटाळ्यामुळे त्यांना सत्तेबाहेर जावे लागणार आहे”, असे म्हणत सिद्धू यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुमारस्वामींचे सरकार कोसळणार ?

News Desk

…तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा, शिवसेना पुन्हा आक्रमक

News Desk

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का,  माजी पाणीपुरवठा मंत्री शिवसेनेत करणार प्रवेश ?

News Desk