HW News Marathi
राजकारण

Shivsena Dasara Melava 2018 | २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार !

मुंबई | राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टिका केली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील अनेक विषयांना हात घातला. २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाऊन राम मंदिरांबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

दसरा मेळाव्यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, दुष्काळ, दहशतवाद या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. तसेच भाजपासाठी अस्मितेचा मुद्दा असलेल्या राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघात केला. आज राम मंदिराबाबत इथून जे बोलत आहे. तेच प्रश्न येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारणार आहे असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एका बापाचे असाल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा! – संजय राऊत

Aprna

युतीसाठी शिवसेनेने सुचविलेला १९९५चा फॉर्म्युला भाजपला मान्य होणार ?

News Desk

जाणून घ्या राफेल कराराबाबत महत्वाचे खुलासे

News Desk
राजकारण

Shivsena Dasara Melava 2018 | सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता !

News Desk

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दस-या मेळाव्याच्या निमित्ताने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी पाकिस्तान व सर्जिकल स्ट्राइक संदर्भात बोलताना केंद्र सरकारच्या धोरणावर देखील उद्धव यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, सतत वल्लभभाई पटेलांचे नाव घेता. अहो मग तुम्ही काय करता, पाकिस्तानचे तुकडे करण्याऐवजी फक्त सोईचे राजकारण केले जात आहे. जर तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले आहे.

राज्य दुष्काळाने होरपळत आहे. हीच परिस्थिती कर्नाटकमध्ये देखील असलेली पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात केवळ दुष्काळावर चर्चा होत आहे पण तिकडे कर्नाटक सरकारने जुन्याच निकषाने दुष्काळ जाहीर केला. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला नाही तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचेही यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

Related posts

#MeToo : परराष्ट्र मंत्री एम.जे.अकबर यांनी दिला राजीनामा

News Desk

सांगलीचे खासदार संजय पाटील यांना मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा!

News Desk

तुम्हाला तिथे बसायची संधी मिळाली, म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो !

News Desk