HW News Marathi
राजकारण

जागावाटपाला उशीर झाला तरी चालेल, पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या !

पुणे | पुण्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात सहकारनगर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. या पूरस्थिती निर्माण झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी आज (२६ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “तिकीटवाटपाला उशीर झाला तरी चालेल. आधी पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या,” असा टोला भुजबळांनी राज्य सरकारला लगावला आहे.

छगन भुजबळ म्हणाले, “सरकारला परिस्थितीचे गांभीर्य नाही. आधी सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आला होता, त्यावेळीही सत्ताधारी तिथे गेले नाही. आता पुण्यात पूर आला आहे. तर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री तिकीट वाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत गेले आहेत. तिकीट वाटपाची चर्चा दोन दिवसांनी झाली तर काहीही बिघडणार नाही,” असे त्यांनी सांगितले. युतीचा तिढा आज दिल्लीत सोडविला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत व्यस्त होते. आता पुण्यात पूर आला आहे. त्यावेळी पालकमंत्री दिल्लीत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या ED च्या कारवाईबाबत अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Aprna

रामदास पाध्यांच्या बोलक्या बाहुल्यांमधले तुम्ही अर्धवट राव तर नाही ना?

News Desk

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही! – उद्धव ठाकरे

Aprna