HW News Marathi
राजकारण

विरोधकांच्या ‘मारक शक्ती’मुळे भाजप नेत्यांचा मृत्यू !

भोपाळ | नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटतील मुख्य आरोपी आणि भाजपच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी “विरोधी पक्षावर मारक शक्तीचा प्रयोग आरोप केल्यामुळे भाजपमधील नेत्यांचे निधन होत आहे,” असे अजब विधान करत तारे तोडले आहे. भोपाळमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या श्रद्धांजली सभेत साध्वी प्रज्ञासिंह यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजप कार्यालयात सोमवारी (२६ ऑगस्ट) माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा नेते बाबूलाल गौर यांच्यासाठी श्रद्धांजली सभा ठेवण्यात आली होती. त्यावेळी प्रदेश भाजपच्या नेत्यांनी दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शोकसभेत बोलताना प्रज्ञासिंह ठाकूर म्हटले की, “विरोधी पक्षावर मारक शक्तीचा प्रयोग आरोप केल्यामुळे भाजपमधील नेत्यांचे निधन होत आहे.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलायम यांनी २०१४ मध्ये देखील असेच विधान मनमोहन सिंग यांच्यासाठी केले होते !

News Desk

निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत नेमके झाले काय

Aprna

…आणि पवारांचा माणूस शिवसेनेचा मंत्री झाला !

News Desk