HW News Marathi
राजकारण

पालघरची पोटनिवडणूक चिटींगने जिंकले

मुंबई | शिवसेनेचा आज ५२ वा वर्धापनदिन आहे त्या निमित्त गोरेगाव येथे शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आम्ही कुणाच्या जीवावर मोठे झालो नाही, राष्ट्रप्रेम, राष्ट्रसेवा हेच आमचे हित आहे. त्यामुळे जिंकल्याशिवाय शांत बसू नका, असे आवाहन शिवसैनीकांना केले.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून देखील आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करेल. तसेच दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद शिवसेना निर्माण करेल, असा आत्मविश्वास वजा चितावनी सामनातून देण्यात आली आहे. त्याचाच पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

पालघरची पोटनिवडणूक बाकीचे चिटींग करुन जिंकले आहेत, अशी टीकाही यावेळी ठाकरे यांनी केली. मेहनतीला पर्याय नाही, आता सत्ता आणायची, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. जिथे सर्वच मेहनत घेतात त्यामुळे आपण एवढे पुढे आलो आहे. सत्ता असो किंवा नसो आपण राष्ट्रप्रेम जपत आलो आहोत. त्यामुळे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आपल्या पक्षाचे नाव आहे असेही यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणालेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोकणात राणे विरुद्ध ठाकरे

News Desk

महिलांचे रक्षण हीच आमची संस्कृती | ठाकरे

News Desk

आधी मला अवघड वाटत होतं मात्र आता यश आपलंच याची खात्री !

News Desk