HW News Marathi
राजकारण

पंकजा मुंडेंनी आपले वचन मोडले ?

मुंबई | जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही, असे धनगर समाजाला जाहीर वचन देणाऱ्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या खंडोबाची यात्रेत आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले होते.

मागील अनेक महिन्यांपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. या दरम्यानच पंकजा मुंडेंनी नांदेडमध्ये धनगर आरक्षण जागर परिषदेत हजेरी लावली होती. “मी पंकजा गोपीनाथ मुंडेंची कन्या, पंकजा मुंडे, आजच्या सभेत तुम्हाला जाहीर वचन देते की, धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्तापरिवर्तन न करता, सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणायचे आहे,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही, याचा विश्वास असल्याचे पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितले होते. परंतु आज मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला पंकजा मुंडेंनी उपस्थिती लावल्याने अनेकासमोर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.

पंकजा मुंडेंना रोखले

दरम्यान, धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना आज मंत्रालयात प्रवेश करताना अडवले. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मंत्रालयात प्रवेश करणार नाही, असे जाहीर वक्तव्य पंकजा मुंडे यांनी नुकतेच केले होते. यासाठी आमदार वडकुते यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करताना पंकजा मुंडे यांना रोखले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीमधील जत तालुक्यातील 40 गावांचा कर्नाटकात समावेश?, बोम्मईंचे मोठे वक्तव्य

Aprna

आमच्या तिघांचा त्रिशूळ सर्व प्रश्न मार्गी लावेल !

News Desk

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा ठराव संमत; पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी

Aprna