HW News Marathi
राजकारण

पर्रीकर जिवंत असतील तर सत्ताधारी भाजपने सिद्ध करुन दाखवावे !

नवी दिल्ली | काँग्रेस नेते जितेंद्र देशप्रभू यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांबद्दल अत्यंत वादग्रस्त असे विधान केले आहे. गेले अनेक दिवस मनोहर पर्रीकर यांची प्रकृती चिंताजनक ते राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. “गोव्याचे मुख्यमंत्री आहेत की नाही?, अशी आमच्या मनात शंका निर्माण होत आहे. पर्रीकर जर जिवंत असतील तर ते सत्ताधारी भाजपने गोव्याच्या लोकांसमोर सिद्ध करुन दाखवावे. खासगी किंवा सार्वजनिकरित्या ते कोठेही दिसून येत नाहीत. तुमच्याकडे जर मुख्यमंत्री नाहीत तर मग त्यांचे श्राद्ध घाला,” असे अत्यंत वादग्रस्त विधान जितेंद्र देशप्रभू यांनी केले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना १४ ऑक्टोबरला नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर पर्रीकर सार्वजनिकरित्या कुठेही दिसून आलेले नाहीत. “मुख्यमंत्र्यांच्या आसपास असलेल्या अधिकाऱ्यांचा समूह त्यांच्या गैरहजेरीत अयोग्यपद्धतीने निर्णय घेत आहे,” असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

दरम्यान, मध्यंतरी गोव्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून भाजप व सत्ताधारी आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या पर्यायी व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली होती. या पर्यायी मुख्यमंत्रीपदासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे नाव सुचविले जात होते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांना राज्यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही, म्हणून हा पर्याय सुचविला जात असल्याचे म्हटले जात होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विरोधकांना पराभूत करण्यासाठी तेलंगणात घुबडांचा वापर

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

जयंत पाटील यांच्या स्वागताला हजारो कार्यकर्ते रस्त्यावर! नियम तोडले म्हणून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का?

News Desk
मुंबई

ओला-उबरच्या चालकाला मारहाण

Gauri Tilekar

मुंबई | गेल्या आठ दिवसापासून ओला – उबर चालकांनी त्यांच्या काही मागण्या पूर्ण होण्यासाठी संप पुकारला होता. ओला उबरच्या राज्य राष्ट्रीय कामगार संघच्या मनमानीमुळे गेल्या सोमवारपासून महाराष्ट्रातील सर्व ओला उबर चालकांनी संप केले आहे. मात्र या ओला उबरच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी जो संप पुकाराला त्यात एका चालकाने सहभाग न घेतल्याने बाकी कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ज्या चालकाला मारहाण झाली त्याचे पाटील नाव असून तो पुण्याचा आहे. पुण्यातून मुंबईला भाडे घेऊन आल्याने त्याला ओला उबरच्या कर्मचाऱ्यांनी भांडुप येथे गाठुन त्याची मारहाण केली आहे. त्यांनतर त्याच्या मारहाणीचा बघून पुण्यातही त्याच्या मित्रांनी त्याची मारहाण केली. या प्रकरणी पाटीलने पोलीसत तक्रार केली .पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

सोमवारी ८ तासांहून अधिक वेळ झालेल्या बैठकीत ऍप बेस्ट टॅक्सी चालक मालकांच्या सुमारे ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहे. परंतु अ‍ॅप बेस्ड टॅक्सी कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रश्नांबाबत परिवहन आयुक्तांच्या बैठकीनंतर संपाबाबत भूमिका घेण्येयात येणार आहे. यामुळे मंगळवारी सकाळी अ‍ॅप बेस्ड टॅक्सी प्रवाशांसाठी ‘ऑफलाइन’ राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Related posts

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतली ८ लाखांची लाच

News Desk

मोनोरेलच्या आगीवर नियंत्रण

News Desk

मुंबईच्या नेपीएन्सी रोडवरील इमारतीला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही

News Desk