HW News Marathi
राजकारण

पवारांचे प्रयत्न निष्फळ, उदयनराजे-निंबाळकरांमधील वाद टोकाला

मुंबई | बारामतीच्या पाण्यावरून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषधेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार, निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या तिघांमध्ये बंद दाराआड शनिवारी (१५ जून) झालेल्या चर्च निंबाळकर आणि उदयनराजे यांच्यातील वाद अत्यंत टोकाला गेले आहेत. या बैठकीत रामराजे आणि उदयनराजे या दोघांनीही एकमेकांवर अत्यंत तीव्र शब्दात टीका केल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“मी काय हातात बांगड्या भरल्या नाहीत. ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी जावे”, अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. “रणजितसिंह आणि जयकुमार हे माझे मित्र आहेत. पवार साहेबांचे देखील इतर पक्षात मित्र आहेत”, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. “जेव्हा रामराजेंकडे खाते होते तेव्हा त्यांनी पाणी वळवले नाही. मात्र, गिरीश महाजन यांनी ते करून दाखवले आहे. ते रामराजेंनी इतकी वर्षे का केले नाही ?”, असा संतप्त सवाल देखील उदयनराजे यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येनंतर ठाकरेंची पंढरीची वारी

News Desk

भगवानगडाला शह देण्यासाठी सावरगावला भगवान बाबांचे नवे स्मारक उभारणार | पंकजा मुंडे

News Desk

पद्मश्री आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप न दिल्याने सरकारचा कोतेपणा उघड !

News Desk