HW News Marathi
राजकारण

शेट्टींच्या वक्तव्यावर पवारांचे टीकास्त्र

पुणे | देशातल्या अल्पसंख्याक समाजाबद्दल अनुद्गार काढताना सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांना शरम वाटला हवी अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पवार पुण्यात बोलत होते. यावेळी बोलताना पवारांनी भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्य प्राप्तीसाठीसाठी झाली होती. त्यात अॅनी बेझंट यांचे मोठे योगदान होते. या प्रकारची विधाने करताना या नेत्यांना शरम वाटली पाहिजे, असेही पवार म्हणालेत. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाविषयी शंका व्यक्त केली होती. त्यावरुन शरद पवारांनी त्यांच्यावर हे टीकास्त्र सोडले आहे.

भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी शुक्रवारी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर सर्व स्तरातून सुरु झालेल्या टिकेमुळे भाजप पक्षनेतृत्वाकडून त्याबाबत जाब विचारण्यात आल्याने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालत दूरध्वनीवरून शेट्टी यांच्याशी संवाद साधल्यामुळे शेट्टी यांनी तुर्तास राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ओवेसी वाट्याची भाषा करत असतील तर ….!

News Desk

मुकेश अंबानी आणि मोदींमध्ये दुरावा, काँग्रेसशी जवळीक ?

News Desk

Chhattisgarh Assembly Elections 2018 : मतदार यादीतून नावे गहाळ

News Desk
शिक्षण

बारावीचा निकाल जाहीर, राज्यात मुलींची बाजी

News Desk

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर बुधवारी जाहीर झाला आहे. एचएससी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेत बारावीचा निकाल जाहीर केला आहे.

बारावीचा निकाल खालील प्रमाणे

  • राज्यात ८८.४१ टक्के
  1. – एकूण विद्यार्थी नोंदणी 1418645
  2. – एकूण विद्यार्थी बसलेली संख्या 1416986 पैकी 1252817 उत्तीर्ण
  3. – कोकण विभाग सर्वाधिक निकाल 94.85 %
  4. – नाशिक विभाग सर्वात कमी निकाल 86.78 %
  5. – गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.9 टक्केने निकालात घट
  6. – मुलीची उत्तीर्ण टक्केवारी – 92.36
  7. – मुलाची उत्तीर्ण टक्केवारी 85.23
  • विभागनिहाय निकाल टक्केवारी
  1. पुणे — 89.58%
  2. नागपूर —87.57%
  3. औरंगाबाद — 88.74%
  4. मुंबई — 87.44
  5. कोल्हापूर — 91.00%
  6. अमरावती — 88.08%
  7. नाशिक — 86.13 %
  8. लातूर — 88.31 %
  9. कोकण — 94.41 %
  10. एकूण — 88.41 %

    विद्यार्थ्यांना निकाल बुधवारी दुपारी 1 वा बोर्डाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

Related posts

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सिध्दांत आणि व्यवहार’ विषयावर चर्चासत्र

News Desk

सर्जनशील मोफत कार्यशाळा

News Desk

सचिन साबू यांना अमेरिकेतील सर्वोच्च बहुमानाचा सन्मान

News Desk