HW News Marathi
राजकारण

शेट्टींच्या वक्तव्यावर पवारांचे टीकास्त्र

पुणे | देशातल्या अल्पसंख्याक समाजाबद्दल अनुद्गार काढताना सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांना शरम वाटला हवी अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पवार पुण्यात बोलत होते. यावेळी बोलताना पवारांनी भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्य प्राप्तीसाठीसाठी झाली होती. त्यात अॅनी बेझंट यांचे मोठे योगदान होते. या प्रकारची विधाने करताना या नेत्यांना शरम वाटली पाहिजे, असेही पवार म्हणालेत. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाविषयी शंका व्यक्त केली होती. त्यावरुन शरद पवारांनी त्यांच्यावर हे टीकास्त्र सोडले आहे.

भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी शुक्रवारी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर सर्व स्तरातून सुरु झालेल्या टिकेमुळे भाजप पक्षनेतृत्वाकडून त्याबाबत जाब विचारण्यात आल्याने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालत दूरध्वनीवरून शेट्टी यांच्याशी संवाद साधल्यामुळे शेट्टी यांनी तुर्तास राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपच्या मेळाव्यात मंत्री गिरिश महाजनांना धक्काबुक्की

News Desk

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी घेतली पर्रीकरांची भेट

News Desk

#LokSabhaElections2019 : मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही !

News Desk
मुंबई

जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे हाल, मध्य रेल्वे ठप्प

News Desk

मुंबई | रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर वाहतूक उशिराने सुरू आहे. दोन्ही मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिट उशीरा होत आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या या रडगाण्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे शनिवारी सकाळी प्रचंड हाल झाल्याचे पहायला मिळाले. संततधार पावसामुळे दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक मंदावली असून याचा फटका प्रवाशांना बसताना पहायला मिळाला.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची कर्जत ते कल्याण दरम्यानची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. कर्जत स्थानकात रुळावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. रुळांवर जवळपास १० ते ११ इंच पाणी साचल्याचे समोर येत आहे. अंबरनाथसह अन्य रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली आहे. कर्जत रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने प्रगती एक्सप्रेसची वाहतूक वळवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार आणि रायगड या भागांना मुसळधार पावसाने झोडपले असून पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विलंबाने सुरु आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्यांची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.

भुसावळ-पुणे एक्स्प्रेस कल्याण-कर्जत मार्गावरुन तर पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दौंड-मनमाड मार्गावर वळविण्यात आली. कर्जत-चौक दरम्यान रुळावर पाणी साचल्याने ११०२५ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस कल्याण-कर्जत मार्गावरुन वळवण्यात आली आहे. तर ११०२६ पुणे- भुसावळ एक्स्प्रेस दौंड–मनमाडमार्गे वळवण्यात आली आहे. तर १२१२६ प्रगती एक्स्प्रेस आणि १७६१४ नांदेड–पनवेल एक्स्प्रेसही कर्जत–पनवेलऐवजी कर्जत–कल्याण मार्गावर वळवण्यात आली आहे.

Related posts

एसी लोकलच्या भाडेवाढीला पुढील सहा महिन्यासाठी स्थगिती

News Desk

दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा ‘रेल रोको’, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशी संप सुरूच, वडाळा आगाराला घेराव

News Desk