HW News Marathi
राजकारण

शेट्टींच्या वक्तव्यावर पवारांचे टीकास्त्र

पुणे | देशातल्या अल्पसंख्याक समाजाबद्दल अनुद्गार काढताना सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांना शरम वाटला हवी अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पवार पुण्यात बोलत होते. यावेळी बोलताना पवारांनी भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्य प्राप्तीसाठीसाठी झाली होती. त्यात अॅनी बेझंट यांचे मोठे योगदान होते. या प्रकारची विधाने करताना या नेत्यांना शरम वाटली पाहिजे, असेही पवार म्हणालेत. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाविषयी शंका व्यक्त केली होती. त्यावरुन शरद पवारांनी त्यांच्यावर हे टीकास्त्र सोडले आहे.

भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी शुक्रवारी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर सर्व स्तरातून सुरु झालेल्या टिकेमुळे भाजप पक्षनेतृत्वाकडून त्याबाबत जाब विचारण्यात आल्याने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालत दूरध्वनीवरून शेट्टी यांच्याशी संवाद साधल्यामुळे शेट्टी यांनी तुर्तास राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांचा उडता प्रचार

News Desk

रथयात्रेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रथाखाली चिरडू !

Gauri Tilekar

गिरीश महाजन यांनी घेतली डॉ. तडवी यांच्या कुटुंबीयांची भेट

News Desk