HW News Marathi
राजकारण

पुणे पोलिसांवर शरद पवारांची जोरदार टीका

पुणे | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कुलकर्णी यांच्या अटकेनंतर त्यांना कर्ज देणा-या बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बँक अधिकाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांनी अततायीपणा केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. मराठेंना अटक केल्यानंतर पुणे पोलिसांवर टीका होत आहे. यावर आज शरद पवारांनी राज्यसरकार जोरदार टीका केली. तसेच पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर होत असून रविंद्र मराठेंना अटक करणे हा पोलिासांचा आततायीपणा असल्याचेही शरद पवार म्हणालेत.

डीएसके प्रकरणात अटक करण्यात आलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि सीईओ रवींद्र मराठे यांच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती आर एन सरदेसाई न्यायालयात गैरहजर राहिल्याने मराठे यांच्या जामिनावरील सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

 शरद पवारांच्या सभेला अखेर परवानगी

swarit

महिलांना 33 टक्के आरक्षण मिळायला हवे

News Desk

नाशिकच्या आदिवांसींना भाजप खासदार म्हणतात मावोवादी

News Desk
मुंबई

लक्ष्यवेधचा ३६ वा “लक्षसिध्दी सोहळा” दिमाखात संपन्न

News Desk

मुंबई | लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स या संस्थेने ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याचे आयोजन केले होते. नुकताच हा लक्षवेध चा “लक्षसिध्दी सोहळा” मैसुर असोसिएशन सभागृह माटुंगा येथे पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एनएसडीएल (NSDL) या संस्थेचे उपाध्यक्ष मनोज साठे हे उपस्थित होते. या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये लक्षवेध संस्थेचे सर्वेसर्वा अतुल राजोळी यांनी मनोज साठे यांच्या सोबत “समृद्धीचा राजमार्ग” ह्या विषयावरील चर्चासत्र घेतले. यावेळी त्यांनी उद्योजकांच्या मनातील प्रश्न त्यांना विचारले.

“आयुष्यात तुम्ही किती पैसे कमावता ही गोष्ट महत्वाची नसते. समृद्धीचा राजमार्ग जर तुम्हाला मिळवायचा असेल तर “वा, वा, वा, वा” या तत्वाला आत्मसात करा. ह्या तत्वामधील पहिला ‘वा’ म्हणजे तुम्ही कमवलेले पैसे वाचवायला शिका, दुसरा ‘वा’ म्हणजे वाढ तुम्ही कमवलेले पैसे काही प्रमाणात गुंतवा जेणे करून त्यामध्ये वाढ होईल. तिसरा ‘वा’ म्हणजे पैश्यांचा वापर करा जेणे करून अर्थव्यवस्था प्रवाहात राहील आणि चौथा शेवटचा ‘वा’ म्हणजे पैसे वाटायला शिका तुमच्या कडील अधिक पैसे गरजू व्यक्तींमध्ये किंवा सामाजिक कार्यासाठी त्याचा वापर करा . हे तत्व तुम्ही पाळलेत तर यश नक्कीच तुमचे होईल’’ असे बहुमूल्य मार्गदर्शन मनोज साठे यांनी ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये उद्योजकांना केले.

व्यावसायिकांना दिग्गज वक्त्यांकडून मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची व्यावसायिक वृद्धी व्हावी म्हणूनलक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स असे परिसंवाद घेत राहील असे लक्षवेध चे संस्थापक अतुल राजोळी यांनी सांगितले. ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

 

Related posts

बाप्पाच्या दर्शनापासून भाविक पाच दिवस वंचित

News Desk

पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने रहिवाशी त्रस्त

News Desk

पती पत्नीसह नऊ जणांना अटक, घरगुती वादात केली कारवाई

News Desk