HW News Marathi
राजकारण

लोकांच्या मनात सत्ता परिवर्तनाची चाहुल !

मुंबई । “केंद्र आणि राज्य सरकार लोकांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. लोकांच्या मनात कुठेतरी सत्ता परिवर्तन झाले पाहिजे असे वाटायला लागले आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १० जानेवारीपासून निर्धार परिवर्तनाचा ही संपर्क यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

देशातील केंद्र सरकारला ५६ महिने तर राज्यातील सरकारला ५० महिने पूर्ण झाले आहेत. परंतु कुठल्याही आश्वासनांची पूर्तता हे सरकार करु शकलेले नाही. ही सत्य परिस्थिती आहे. लोकांच्या मनात मोदींनी दिलेली आश्वासनांची पूर्तता झाली नाही. राज्याने ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद चले चलो मोदीजी के साथ’ अशी घोषणा देऊन बरीच आश्वासने दिली होती. परंतु एकंदरीत केंद्र आणि राज्य सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

रायगडावर शिवाजी महाराजांचे दर्शन, ऐतिहासिक चवदार तळयाच्या ठिकाणी पहिली जाहीर सभा

रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आणि त्यांना वंदन करून सुरुवात केली जाणार आहे. तर महाड येथे चवदार तळयाच्या ठिकाणी पहिली सभा घेतली जाणार आहे. पहिला टप्पा १० ते १४ जानेवारी असा असणार आहे. कोकणातील रायगड-महाड, गुहागर, खेड, कर्जत, नवी मुंबई, ठाणे, विक्रमगड, मुरबाड, उल्हासनगर, भिवंडी ग्रामीण, कल्याण, अंबरनाथ येथे जाहीर सभा होणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.

दुसरा टप्पा हा १६ जानेवारीपासून नाशिकपासून सुरु होणार, याची माहिती दिली जाईल. तिसरा टप्पा विदर्भात होणार आहे. या संपर्क यात्रेतून केंद्र आणि राज्य सरकारने जनतेला जी आश्वासने दिली होती त्याची आठवण करुन देण्यासाठी आणि जनतेला राजकीय काय परिस्थिती आहे याची माहिती दिली जाणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने माणसांचे इमान विकत घेण्याचा पॅटर्न राबवला !

News Desk

मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही! – उद्धव ठाकरे

Aprna

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ?

News Desk