HW News Marathi
राजकारण

आजही लोकांचा मोदींवर विश्वास आहे | पियुष गोयल

मुंबई | “दिल्लीत भाजपने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते. आमचे कार्यकर्ते आता उत्साहात कामाला लागले आहेत. लोकांचा मोदींवर आजही विश्वास आहे. पुन्हा एकदा जनता मोदी सरकारला कौल देईल”, असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. “जेवढ्या आघाड्या करायच्या तेवढ्या करू दे आम्ही सक्षम आहोत. जे ५० वर्षात झाले नाही ते ५ वर्षात झाले. फक्त एका कुटुंबाने तब्ब्ल ५० वर्षे भ्रष्टाचार केला. एकही क्षेत्रात या लोकांनी भ्रष्टाचार करायचे सोडले नाही”, असे म्हणत पियुष गोयल यांनी नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पियुष गोयल हे मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

पियुष गोयल यांना स्वतः:चा फोटो पोस्टरवर आवडत नाही !

दरम्यान, ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी काही वेळ आधी पियुष गोयल यांचा फोटो पोस्टरवरून हटवण्यात आला. “पियुष गोयल यांना स्वतः:चा फोटो पोस्टरवर आवडत नाही”, असे कारण देत हा फोटो हटविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या पोस्टरवर असलेला आशिष शेलार यांचा फोटो देखील लहान करण्यात आला, दरम्यान यामागे नेमके काय सत्य आहे हे समजणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पियुष गोयल काय म्हणाले ?

  • दिल्लीत भाजपने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते. त्यामध्ये भाजपचे सर्व मंत्री तसेच देशातील सर्व भाजपचे नेते असे एकूण १२,००० जण एकत्र आले होते.
  • आम्ही लोकांसमोर कसे जाऊ शकतो ?, यावर यावेळी चर्चा झाली. आमचे कार्यकर्ते आता उत्साहात कामाला लागले आहेत.
  • बहुमताने पुन्हा एकदा आमचे सरकार येईल, यासाठी आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत
  • २०१३-१४ च्या परिस्थितीला बदलून आज भारताने एक वेगळी उंची गाठली आहे. आज महागाई पण कमी झाली असून हे सर्व २०१४ ते २०१९ च्या दरम्यान झाले आहे.
  • देशाची अर्थव्यवस्था आज सक्षम झालेली आहे, आज देशात प्रत्येकाला वीज मिळत आहे, आज देशात साडेनऊ करोड शौचालय बनले आहेत
  • आज देशात ६ करोड गरिबांना मोफत कुकिंग गॅस दिले आहेत. फक्त २ ते अडीच करोड लोकांना फक्त मोफत गॅस देण्याचे शिल्लक राहील आहेत.
  • आयुष्यमान भारतच्या माध्यमातून ५० करोड लोकांना फायदा होत आहे
  • देशाला या पाच वर्षात भ्रष्टाचार मुक्त सरकार मिळाले
  • फक्त एका कुटुंबाने तब्ब्ल ५० वर्षे भ्रष्टाचार केला. एकही क्षेत्रात या लोकांनी भ्रष्टाचार करायचे सोडले नाही
  • आम्ही लोकांना लाचारी नाही दाखवली रस्ते दाखवले
  • आम्ही पारदर्शीपणे लोकांना लाभ पोहोचेल असे काम केले
  • आम्ही गरिबांपर्यत प्रत्येक योजना इमानदारीने पोहोचवण्याचे काम केले
  • आजही लोकांचा मोदींवर विश्वास आहे
  • एक मजबूत सरकार जे देशाला आणि लोकांना देण्याचे काम मोदींनी केले
  • मजबूर सरकारपेक्षा आम्ही मजबूत सरकार दिले
  • पुन्हा एकदा जनता मोदी सरकारला कौल देईल
  • जेवढ्या आघाड्या करायच्या तेवढ्या करू दे आम्ही सक्षम आहोत
  • या देशात अच्छे दिन आलेत आणि अजून येतील
  • मागच्या सरकारने मुंबईचा विचार का केला नाही
  • जे ५० वर्षात झाले नाही ते ५ वर्षात झाले
  • मुंबईमध्ये या पाच वर्षात गतीने कामे सुरू आहेत
  • आधीच्या सरकारने का कामाना मंजुरी दिली नाही. आज मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे जे आमच्या काळात झाले. ५ वर्षात जी काम झाली ती याआधी कधी झाली नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरतेय”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Aprna

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक 6 डिसेंबर 2020 पर्यंत उभारले जाणार !

News Desk

“शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी” अजित पवारांची सभागृहात मागणी

Aprna