HW News Marathi
राजकारण

जनतेचा आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास !

नवी दिल्ली | राफेल करारात कोणतीही अनियमितता नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी शुक्रवारी (१४ डिसेंबर) सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली आहे. “राहुल गांधीनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर टीका केली. राहुल गांधींनी खोटं बोलून राफेल कराराबाबत अपप्रचार करून सरकारची आणि पर्यायाने देशाची बदनामी केली”, असा आरोप केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

“जनतेचा आजही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे”, असा दावा देखील प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. “राहुल गांधींना कधीही राफेलबाबत चर्चा करण्याची इच्छा नव्हती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सत्य जनतेसमोर उघड झाले आहे.राहुल गांधी यांनी एवढे दिवस देशातील जनतेची फसवणूक करून गुन्हा केला आहे. याबाबत त्यांनी देशाची माफी मागायला हवी”, असेही प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, “राफेल कराराची माहिती राहुल गांधींना कशी मिळाली याबाबतची माहिती त्यांनी सर्वांना द्यावी”, असे म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. “यापुढे राहुल गांधींनी असे बालिश आरोप करू नयेत”, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवनिर्वाचित खासदारांसह उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येत जाणार

News Desk

…तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान

News Desk

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार! – उद्धव ठाकरे

Aprna