HW News Marathi
राजकारण

रामदास कदम उद्धव ठाकरेंचा कुत्रा, नितेश राणेंची जहरी टीका

मुंबई | पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रत्नागिरी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार नारायण राणे यांना टीका केली होती. रामदास कदम यांच्या टीकेनंतर राणेंचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांना प्रचंड राग आला आहे. नितेश राणे यांनी रामदास कदमांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी त्यांची तुलना थेट कुत्र्याशी केली आहे.

“स्व. माननीय बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील. त्यांना कुत्रे आवडतात. उद्धव ठाकरेंनी पण तीच परंपरा चालू ठेवली आहे…रामदास कदमच्या रुपात! सतत भुकत असतो..त्याला हे माहित नाही.. भुकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!” अशी जहरी टीका नितेश राणे यांनी ट्विट करून केले आहे.

‘नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’ अशा शब्दात पर्यावरण रामदास कदम यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. रत्नागिरी येथील शुक्रवारी (१४ डिसेंबर) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नारायण राणे यांच्यावर रामदास कदम यांनी टीका केली होती.

रामदास कदम नेमके काय म्हणाले

“या राणेंनी आतापर्यंत किती पक्ष बदलले. शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, आता भाजपमध्ये आलेत. त्यांच्यासाठी आता फक्त रामदास आठवलेंचा पक्ष बाकी राहिलाय. राणे बघावे तेव्हा मातोश्रीवर टीका करतात. मात्र, आपली तेवढी औकात आहे का, हे त्यांनी तपासून बघावे. याच शिवसेनेच्या जोरावर नारायण राणे आणि त्यांच्या मुलाबाळांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली. त्यामुळे मातोश्रीवर बोलण्याची त्यांची औकात आहे का? नारायण राणेंसारख्या व्यक्तीला ‘सूर्याजी पिसाळची अवलाद’ ही उपमादेखील कमी पडेल. नारायण राणे हा कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही”, असे कदम म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुळजाभवानीला साकडे घालत राष्ट्रवादीचा तुळजापुरातून हल्लाबोल

swarit

अखेर एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; देवेंद्र फडणवीसांसोबत राज्यपालांची घेणार भेट

Aprna

राहुल गांधींनी देशाची माफी मागावी | दाणवे

News Desk