HW News Marathi
राजकारण

१०० दिवसांत मोदी सरकारपासून देशातील जनता मुक्त होईल !

नवी दिल्ली | देशातील जनतेची मोदी सरकारपासून १०० दिवसांत सुटका होईल, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी हे दिल्लीतून रविवारी (२१ जानेवारी) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भाजपच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीवर प्रचंड टीका केली. यावेळी ‘स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहे. हे सर्व पक्ष वाचवा, वाचवा ओरडत आहेत,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्याला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले आहे.

“देशातील लाखो बेरोजगार तरुण, संकटात असलेले शेतकरी, हक्कांपासून वंचित दलित आणि आदिवासी, अल्पसंख्यांक, उद्ध्वस्त व्यापारी तुमच्या अत्याचार आणि अक्षमतेपासून मुक्त होण्यासाठी मदत मागत आहेत. मात्र १०० दिवसांत ते मुक्त होतील,’ असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बोलत होते. “विरोधकांजवळ धनशक्ती असली तरी आमच्याजवळ जनशक्ती आहे. विरोधकांची महाआघाडी हे नामदारांचे बंधन आहे. हे बंधन भाऊ-पुतण्या वाद, भ्रष्टाचार, घोटाळा, नकारात्मकता आणि असमानता यांचे गठबंधन आहे. हा एक अद्भुत संगम आहे”, असा खोचक टोला यावेळी पंतप्रधान मोदींनी लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामविकासाचा ध्यास असणारा नेता हरपला | आठवले

News Desk

येत्या ९० दिवसांत मुंबई शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करून शहराचा कायापालट करण्याचे नियोजन! – मुख्यमंत्री

Aprna

#LokSabhaElections2019 : “फिर एक बार मोदी सरकार”, असे ट्विट करत मोदींची जनतेला साद

News Desk