HW News Marathi
राजकारण

छोट्या दुकानदारांना दिलासा; पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरण्याची परवानगी

मुंबई | मोठ्या उत्पादकांना आपले उत्पादन प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये देण्याची सवलत आता किरणा दुकानांवरील प्लॅस्टिक पॅकिंगलाही लागू होणार आहे. याविषयीची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. पावकिलोपेक्षा अधिक वजनाचा माल पॅकिंग करण्यासाठी ही सूट देण्यात आली असून हे प्लॅस्टिक पुन्हा रस्त्यावर येणार नाही त्याचे रिसायकलिंग केले जाईल याची काळजी या दुकानदारांना घ्यावी लागणार आहे.

किराणा दुकानदारांना प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये देण्यात आलेल्या सवलतीबाबतची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. ते म्हणाले, किरणा दुकानदारांच्या शिष्टमंडळाने प्लॅस्टिक पॅकिंगसाठी सूट मिळावी म्हणून शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. प्लॅस्टिक पॅकिंग विषयीच्या या प्रस्तावाबाबत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत किरणा दुकानांवरील प्लॅस्टिक पॅकिंगसाठी असलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

तर पावकिलोवरील किराणा मालाच्या पॅकिंगसाठी असलेली प्लॅस्टिक बंदी मागे घेण्यात आली असली तरी हे प्लॅस्टिक परत घेण्याची ही जबाबदारी संबंधित दुकानदारांची असणार आहे. हे प्लॅस्टिक रस्त्यावर येणार नाही याची काळजी संबंधित दुकानदारांची असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एका बापाचे असाल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा! – संजय राऊत

Aprna

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटावरून राजकारण पेटले

News Desk

जाणून घ्या… काय आहे ऑगस्ता घोटाळा

News Desk
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या चार जागांचा आज निकाल

News Desk

मुंबई | विधानपरिषदेच्या चार चागांसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर होणार आहे. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागांचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघात प्रतिष्ठेची लढाई

विधानपरिषदेच्या चार जागापैकी कोकण पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. कारण निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे डावखरे यांना हारविण्यासाठी राष्ट्रवादीने नजीब मुल्ला यांना समोर उभे केले आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना, मनसे आणि भाजप या पक्षांनी निवडणुकीसाठी सर्व ताकद लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या मतदारसंघात भाजपने अॅड. अमितकुमार मेहता, शिवसेनेचे विलास पोतनीस आणि मनसे राजू बंडगर उमेदवार आहेत.

मुंबई शिक्षक मतदारसंघ

शिवसेनेचे शिवाजी शेंडगे, लोकभारतीचे कपिल पाटील आणि भाजपचे अनिल देशमुख या तिन्ही उमेदवारांमध्ये लढत आहे. यात नक्की कोणत्या पक्षचा विजयी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिक मतदारसंघ

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे, शिवसेनेच्या वतीने विधानपरिषदेत नुकतेच विजयी झालेल्या नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे आणि भाजपचे अनिकेत पाटील यांनी हे उमेदवार आहेत.

Related posts

शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार! – वर्षा गायकवाड

Aprna

एका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे…कंगणाने थेट मुख्यमंत्र्यांना केले टार्गेट

News Desk

धवलसिंहांनी बिबट्याला टिपलं तसं आता भाजपला टिपणार – धीरज देशमुख

News Desk