HW News Marathi
राजकारण

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीविषयी केलेल्या विधानाबाबत पित्रोदा यांनी माफी मागावी !

नवी दिल्ली | काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी १९८४ सालच्या शीखविरोधी दंगलीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत माफी मागावी असा आदेश काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला आहे. सॅम पित्रोदा यांचे विधान हे वैयक्तिक असून पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे सांगत राहुल गांधी यांनी सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या या विधानाबाबत माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याप्रकरणी भाष्य केले आहे.

“मला असे वाटते कि सॅम पित्रोदा यांनी जे विधान केले आहे ते पक्षाच्या भूमिकेशी पूर्णपणे फारकत घेणारे आहे. म्हणूनच यासाठी त्यांनी माफी मागायला हवी. १९८४ सालची दंगल ही एक अत्यंत मोठी दुर्घटना आहे. या दुर्घटनेमुळे लोकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला आहे. याप्रकरणातील पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे. जे लोक यासाठी जबाबदार आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे”, असे राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले होते सॅम पित्रोदा ?

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दिल्लीतील रामलीला मैदानात आपल्या प्रचारसभेत शीख दंगलीवरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. “काँग्रेसला आपल्या पूर्वजांच्या नावावर मते हवी आहेत. परंतु, त्यांची कारस्थाने समोर आणली कि त्यांना त्रास होतो. १९८४ च्या शीख दंगलीचा हिशेब कोण देणार ?”, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला होता.

सॅम पित्रोदा या पार्श्वभूमीवर म्हणाले होते कि, “आता १९८४ चा काय संबंध ? तुम्ही (मोदी) ५ वर्षात काय केले, त्यावर बोला. १९८४ मध्ये जे झाले ते झाले. तुम्ही काय केले ? रोजगार निर्मितीसाठी, २०० स्मार्ट सिटीजसाठी तुम्हाला मत देण्यात आले होते. तुम्ही ते देखील नाही केले.” त्यावर शुक्रवारी सॅम पित्रोदा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “शीख बंधू-भगिनींचे दुःख मी समजू शकतो. भाजपकडून माझ्या तीन शब्दांची मोडतोड करून चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे”, असे सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता मुंबईचे डबेवाले देखील अयोध्येला जाणार

Gauri Tilekar

कोलकात्यामध्ये टीएमसी-भाजप संघर्षाने घेतले हिंसक वळण

News Desk

राज्य सरकारकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

News Desk