HW News Marathi
राजकारण

प्लास्टिक बंदी पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की पर्यावरणाच्या रक्षणासाठी – नवाब मलिक

मुंबई | राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू करताच मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर महापालिकांकडून धडक कारवाई करण्यात आली. प्लास्टिक बंदीने व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना पेचात पाडले आहे. प्लास्टिक वापरले की प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे. मात्र प्लास्टिक पिशव्यांना ठोस पर्याय उपलब्ध नसल्याने सर्वांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

ज्या वस्तुंचा पुर्नवापर होतो त्यावर बंदी आणि ज्या वस्तुंचे रिसायकल होत नाही त्यावर बंदी नाही. सरकारची ही अभ्यासपूर्ण प्लास्टीक बंदी पर्यावरणाच्या रक्षणासाठी की पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की तोडपाणीसाठी असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना आणि भाजपवर केला.

तसेच यावेळी बोलताना मलिक म्हणाले, सरकारने प्लास्टीक बंदी करताना अभ्यास केलेला नाही. हा निर्णय राजकीय फायदा होण्यासाठी आणि जनतेला अडचणीत आणण्यासाठी घेण्यात आला आहे. विदेशी कंपन्यांच्या दबावामुळे सरकारने रिसायकल वस्तूंवर बंदी आणली नाही. याचा अर्थ सरकारचा उद्देश आणि नियत साफ नव्हती असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला”, अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

#Results2018 : वसुंधरा राजे जिंकल्या, भाजप हारले

News Desk

हिंदुस्थान कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसला आणि तिकडे रशियाने कोरोनावर ‘लस’ बनवून बाजारात आणली

swarit