HW News Marathi
राजकारण

प्लास्टिक बंदी पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की पर्यावरणाच्या रक्षणासाठी – नवाब मलिक

मुंबई | राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू करताच मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर महापालिकांकडून धडक कारवाई करण्यात आली. प्लास्टिक बंदीने व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना पेचात पाडले आहे. प्लास्टिक वापरले की प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे. मात्र प्लास्टिक पिशव्यांना ठोस पर्याय उपलब्ध नसल्याने सर्वांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

ज्या वस्तुंचा पुर्नवापर होतो त्यावर बंदी आणि ज्या वस्तुंचे रिसायकल होत नाही त्यावर बंदी नाही. सरकारची ही अभ्यासपूर्ण प्लास्टीक बंदी पर्यावरणाच्या रक्षणासाठी की पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की तोडपाणीसाठी असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना आणि भाजपवर केला.

तसेच यावेळी बोलताना मलिक म्हणाले, सरकारने प्लास्टीक बंदी करताना अभ्यास केलेला नाही. हा निर्णय राजकीय फायदा होण्यासाठी आणि जनतेला अडचणीत आणण्यासाठी घेण्यात आला आहे. विदेशी कंपन्यांच्या दबावामुळे सरकारने रिसायकल वस्तूंवर बंदी आणली नाही. याचा अर्थ सरकारचा उद्देश आणि नियत साफ नव्हती असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पवारांविरोधात निवडणूक लढणार नाही, उदयनराजेंचे डोळे पाणावले

News Desk

पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार योजनेतील वाहनांचे वितरण

News Desk

उदयनराजेंना आवरा, अन्यथा पक्षातून बाहेर पडू !

News Desk
राजकारण

संविधानाला कोणताही धोका नाही- आठवले

News Desk

मुंबई | महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असल्याचा गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. संविधानाला, आरक्षणाला आणि ऍट्रोसीटी कायद्याला केंद्र सरकार चे पूर्ण संरक्षण राहील याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी अनेकदा दिली आहे.मात्र तरीही विरोधकांकडून संविधानाला बदलले जाणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. विरोधकांचा अपप्रचार खोडून काढताना संविधानाला कोणताही धोका नसल्याचा जोरदार दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

संविधानाला, आरक्षणाला आणि ऍट्रोसिटी कायद्याला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल. जे संविधानाला धक्का देण्याचा प्रयत्न करतील त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन रामदास आठवलेंनी केले. उल्हासनगर येथील टाऊन हॉल मध्ये रिपाइंचे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात रामदास अठवले बोलत होते.यावेळी विचारमंचावर उल्हासनगर च्या महापौर आयलानी आमदार बालाजी किणीकर, आमदार किसन कथोरे रिपाइं चे राष्ट्रीय पदाधिकारी सुरेश सावंत, बी बी मोरे, प्रल्हाद जाधव हेमंत रणपिसे घनश्याम चिरणकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. भगवान भालेराव हे सर्वांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्ष वाढविण्याचे काम करीत असल्याबद्दल सर्व वक्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

भारताने पाकिस्तानशी लढाई केली तर पाकिस्तान शिल्लक राहणार नाही.उल्हासनगरात मोठ्या संख्येने सिंधी समाज आहे. सिंधी समाज पाकिस्तान मधून भारतात आला आहे. मेहनतीने भारतात राहणारा राष्ट्रप्रेमी सिंधी समाजाने प्रगती केली आहे. सिंधी समाजाला आरक्षण देण्याची झालेली मागणी योग्य असून त्यासाठी आपण प्रयत्न करू. ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही त्या समाजांना जातींना स्वतंत्र प्रवर्ग करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी आराक्षणाची मर्यादा 75 टक्के करण्यात यावी.सामाजिक आरक्षण 50 टक्के आणि आर्थिक निकषावरील आरक्षण 25 टक्के करून त्यात मराठा, जाट, गुज्जर या जातींप्रमाणे सिंधी समाजाला ही आरक्षण देण्यात यावे.त्यामुळे अनुसूचित जातीजमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असे रामदास आठवलेंनी स्पष्ट केले. यावेळी मोठया संख्येने रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

राम कदम यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाख रुपये | सुबोध सावजी

News Desk

“नुसती दाढी वाढवून काय फायदा ? लग्न तर करून बघा…”, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना टोला

Darrell Miranda

गडचिरोलीत मतदान करून परतणाऱ्या मतदारांचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

News Desk