HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींचा फोन घेण्यास ममता दीदींचा नकार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये आलेल्या फनी वादळाची माहिती घेण्यासाठी फोन केला होता. परंतु तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींशी फोनवर संवाद साधण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर मोदींनी पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.

तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या आरोपानंतर पीएमओने ही माहिती दिली. काल (४ मे) सकाळी दोनवेळा ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या स्टाफने ममता बॅनर्जी यांना फोनही केला होता. मात्र, ममता बॅनर्जी एका दौऱ्यावर असल्याचे सांगिण्यात आले. या दौऱ्यावरून परत येताच त्या पंतप्रधानांना फोन करतील, असे सांगण्यात आल्याची माहिती मिळाली होती. याप्रकारे दोनवेळेस पीएमओ कार्यालयाने संपर्क साधूनही मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत, असे सांगितले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनी चक्रीवादाळानंतर ओडिशाचे मुख्यंमत्री नवीन पटनायक यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे मोदींकडून शिष्टाचार नियमांचा अपमान केल्याचं तृणमूल काँग्रेसने म्हटले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर

News Desk

“मविआ’चा प्रयोग फसला म्हणणे म्हणजे राजकीय अज्ञान”, शरद पवारांचा विरोधकांना टोला

Aprna

“संजय राठोड यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात केलेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी”, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Aprna