HW News Marathi
राजकारण

जी आग तुमच्या मनात आहे तीच माझ्याही मनात !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (१७ फेब्रुवारी) बिहार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुलवामातील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. “देशवासीयांच्या मनात जी आग लागली आहे त्याचा अनुभव मला येत आहे. जी आग तुमच्या मनात आहे तशीच ती माझ्याही मनात आहे”, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी सीआरपीएफच्या ताफ्यातील शहीद झालेल्या बिहारमधील जवानांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांदरम्यान बोलत होते. ”पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेले पाटणा येथील जवान संजयकुमार सिन्हा आणि भागलपूर येथील जवान रतनकुमार ठाकूर यांना मी आदरांजली वाहतो. मी त्यांच्या कुटुंबाप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो. पुलवामा येथील हल्यानंतर तुमच्या मनात किती आग लागली आहे त्याची मला कल्पना आहेच. जी आग तुमच्या मनात लागली आहे. तशीच ती माझ्याही मनात आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर…”, नितेश राणेंचा पत्रातून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला

News Desk

2019च्या निवडणुकांमध्ये मोदी ना इथले राहतील ना तिथले। माजिद मेनन

News Desk

महाराष्ट्रातील सत्तांतरावर 8 ऑगस्टला होणार सुनावणी

Aprna