HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्रात आलेले पहिले उत्तर भारतीय प्रभू राम होते !

मुंबई | “उत्तर भारतीय लोक हे मुंबईचा कणा असून उत्तर भारतीयांनी त्यांच्या प्रगतीसाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय समाजाचे नाते फार जुने आहे. या समाजाने केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे”, असे गौरवोद्गार भाजप खासदार पूनम महाजन यांनी काढले आहेत. त्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.

“महाराष्ट्र आणि उत्तर भारताचे नाते फार जुने आहे. महाराष्ट्रात आलेले पहिले उत्तर भारतीय प्रभू राम होते, असा दावाही पूनम महाजन यांनी यावेळी केला आहे. उत्तर भारतीय समाज तुम्हाला फक्त मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतो. महाराष्ट्राच्या प्रगतीत या समाजाचं योगदान अतिशय मोठं आहे”, असे पूनम महाजन यावेळी म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बाप कोण, पोरे कोण काहीच कळत नाही !

News Desk

उध्दव, राज व आंबेडकर यांची निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरची मागणी

News Desk

#LokSabhaElections2019 : सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार

News Desk