HW News Marathi
राजकारण

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला लागा !

मुंबई | आपल्या मित्र पक्षांनी निवडणुकांची तयारी खूप आधीच सुरुवात केली आहे. रिपब्लिकन पक्षाने देखील ही लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरु करायला हवी. भाजप-रिपाइंची युती राहणार असून लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. रिपाइंच्या राज्यकार्यकारिणीच्या बैठकीत ते आज बोलत होते.

या बैठकीत झालेल्या चर्चेत रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाची बोलणी निश्चित करण्यासाठी पक्षातील नेत्यांची कमिटी बनवावी. राज्यातील लातूर, सोलापूर, सातारा आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघावर रिपाइंचा दावा करावा, अशी सूचना रामदास आठवले यांच्याकडून करण्यात आली आहे. देशभरातून रिपाइंचे दहा खासदार रामदास आठवलेंच्या नेतृत्वात निवडून आणण्याचे उद्दिष्ट्य लोकसभा निवडणुकीत ठेवावे, अशी सूचना रिपाइं पदाधिकाऱ्यांनी राज्यकार्यकरिणीच्या बैठकीत केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात जनतेवर विषप्रयोग करणारे सरकारः खा. अशोक चव्हाण

News Desk

बांदेकरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

News Desk

साताऱ्यातील पावसाचा एक राजकीय बळी !

News Desk