HW News Marathi
राजकारण

भारतात इतकी ताकद आहे की आपण शब्‍दकोशातील शब्‍दांचे अर्थ देखील बदलले !

नवी दिल्ली | “भारतात इतकी ताकद आहे की, आपण शब्‍दकोशातील शब्‍दांचे अर्थ देखील बदलले आहेत. कमांडर ‘अभिनंदन’ हे त्यांच्याचपैकी एक आहेत. जगाला अभिनंदन यांच्या धैर्याचे, शौर्याचे, संयमाचे दर्शन घडले”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमांडर अभिनंदन यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज (२ मार्च) नवी दिल्लीतील विज्ञान भवनात ‘कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इंडिया २०१९’चे उद्धाटन झाले. यावेळी ते बोलत होते. कमांडर अभिनंदन यांचे मायभूमीत सुखरूप परतणे हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला. पंतप्रधान मोदींनी देखील यावेळी याबाबत आपली भावना व्यक्त केली.

“जागतिक पातळीवर आपल्या देशाची एक वेगळी ताकद निर्माण होत आहे. हा नवा भारत आहे. जगभरात एक यशस्वी राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. भारताच्या प्रत्येक पावलाकडे जगाचे बारीक लक्ष आहे”, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान तब्बल ६० तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर आज (१ मार्च) मायभूमीत सुखरूप परतले आहेत. संपूर्ण देश कमांडर अभिनंदन यांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या मोदींनी भाजपच्या प्रचारात ट्रम्प, पुतीन यांना उतरवले तर चालेल काय ? 

News Desk

राज ठाकरेंच्या भेटीसाठी बेस्टचे शिष्टमंडळ ‘कृष्णकुंज’वर

News Desk

देशात ६० वर्षांमध्ये काही झालेच नसते, तुम्ही सोशल मीडियातून खोटा प्रचार कसा केला असता !

News Desk