HW News Marathi
देश / विदेश

इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, पाकिस्तानची मागणी

नवी दिल्ली | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेत मांडण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने १४ फेब्रुवारीला सीआरपीएफ जवानांवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला. पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबावाचा गेले अनेक दिवस पाकिस्तानला सामना करावा लागत आहे. त्यातच आता पाकिस्तानकडून इम्रान खान यांना नोबेल पुरस्कार द्यावा अशी मागणी केली जात आहे.

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी आज (२ मार्च) संसदेत हा प्रस्ताव दाखल केला आहे. इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असून त्याबद्दल त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात यावा, असे या प्रस्तावात म्हणण्यात आले आहे. सोशल मीडियावर देखील #NobelPeacePrizeForImranKhan असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कमांडर अभिनंदन आता भारतात सुखरूप परतले असले तरी पाकिस्तानच्या कुरापती मात्र कमी झालेल्या नाहीत. वारंवार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. एकीकडे शांततेची भाषा करणारा पाकिस्तान दुसरीकडे मात्र वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. पाकिस्ताच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि या संघटनेचा म्होरक्या मसूद अझरची पाठराखण देखील केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले, ६ जणांचा मृत्यू तर २० प्रवासी जखमी

News Desk

श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल

Gauri Tilekar

Karnataka Crisis : बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिली ६ वाजेपर्यंतची मुदत

News Desk