HW News Marathi
राजकारण

सौंगध मुझे इस मिट्टी की मैं देश नही मिटने दूंगा !

चुरु | पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त करून मोठी कारवाई केली आहे. भारतीय जवानांच्या शौर्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम केला आहे. ‘सौंगध मुझे इस मिट्टी की मैं देश नही मिटने दूंगा’ या कवितेने मोदींनी राजस्थानमधील चुरुमध्ये आज (२६ फेब्रुवारी) झालेल्या जाहीर सभेत भाषणाला सुरुवात केली. मोदींनी भारतीय लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले आहे.

तसेच देश सुरक्षित हातांमध्ये आहे. या जाहीर सभेत आज पुन्हा एकदा देशाला हा प्रधानसेवक नमन करत आहे, असे मोदी म्हणाले. राजस्थानच्या काँग्रेस सरकारने शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांची यादी पाठविली नसल्याचा आरोप मोदींनी केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. आता शेतकरी बँकेत जाऊन पैसे काढू शकतात, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

दहशतवाद्यांच्या या कारवाईत भारतीय वायू सेनेच्या ‘मिराज २०००’च्या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळापास २०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारताने आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अलविदा रॉकी ! ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या श्वानाचे निधन

swarit

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा – तसा वाटला का?”, अजित पवारांचा संतप्त सवाल

Aprna

जय हिंदऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ घोषणा देणाऱ्यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती !

News Desk