HW News Marathi
राजकारण

आज भाजपचे उपोषण

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर देशभरात भाजपचे नेते उपोषणाला बसले आहेत. दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी देखील या एकदिवसीय उपोषणात सहभागी झालेले आहेत. कॉंग्रेसच्या उपोषणाचा फज्जा उडाल्यानंतर भाजपचे उपोषण यशस्वी होणार का ? याकडे सध्या जनतेचे लक्ष लागलेले आहे.

विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवशेन वाया गेल्याच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपने एकदिवसीय देशव्यापी उपोषण आंदोलन सुरु केले आहे.

सध्याच्या उपोषणाच्या राजकारणामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील व्यथित झाले आहेत. आजच्या उपोषणात भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार आज दिवसभर उपोषण करणार आहेत. पंतप्रधान दैनंदिन कामात व्यस्त असूनही ते आज उपवास करणार आहेत.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत भांडून (पश्चिम) रेल्वे स्टेशन परिसरात ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसलेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी १२ वाजल्यापासून विलेपार्ले येथे उपोषणाला बसले आहेत.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कवी मनाचे महानेतृत्व हरपले | आठवले

News Desk

धवलसिंह मोहिते-पाटील यांची रणजितसिंह निंबाळकर यांना साथ

News Desk

Impact Story : HW मराठीच्या रिपोर्टची अधिवेशनात दखल; ३७ लाख शेतकऱ्यांची व्यथा; पहा काय आहे प्रकरण

Aprna
मुंबई

भावी पोलिसांसाठी मनसे आली धावून

News Desk

नवी मुंबई | राज्यभरातून पोलीस भरतीसाठी मुंबईत येणा-या ग्रामीण भागातील तरुणांचे नेहमीच हाल होतात. यावर अनेकदा बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. आरोप प्रत्यारोप होतात मात्र कोणीही या तरुणांची मदत करताना दिसून येत नाही. मात्र यावेळी नवी मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्याच्या व्यवस्था करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तरुणांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत पहायला मिळत आहे.

नवी मुंबईत मनसे कार्यकर्ते गजानन काळे यांनी या पोलीस भरतीसाठी आलेल्या सुमारे ४०० ते ५०० मुला-मुलींची रहाण्याची व जेवण्याची व्यवस्था केल्यामुळे नवी मुंबई ग्रामीण बेरोजगार तरुणांसाठी मनसे धावून आली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागातून भरतीसाठी आलेल्या तरुणांना नेहमीच रात्रीच्या वेळी पदपथावर झोपावे लागते. दरवर्षीच्या या समस्यांवर तोडगा काढत मनसे कार्यकर्त्यांनी केलेली ही व्यवस्था सध्या नवी मुंबईत चर्चेचा विषय ठरली आहे.

Related posts

व्यापाऱ्यांना फटाका विक्री परवान्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत

News Desk

मराठा पक्ष स्थापनेचा घोषणा?

News Desk

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk