HW News Marathi
राजकारण

मतदारांना जागरुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘टॅग मिशन’

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. देशभरात ११ एप्रिल ते १९ मे याकालावधीत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांना टॅग करुन आवाहन केले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्राबाबू नायडू, एच डी कुमारस्वामी, नवीन पटनायक यांना टॅग केले आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार अभिनेता रणबीर सिंग, वरुण धवन आणि विकी कौशल यांना टॅग केले आहे. यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि आलिया भट्ट यांना टॅक केले आहे.

लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना मतदान जागरुक करा, देशभरात मोठ्या प्रमाणात मतदान करायला हवे. यासाठी मोदींनी ट्विटकरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, विरोधी पक्षांचे नेते, सर्व राज्यातील मुख्यमंत्री, क्रिडा क्षेत्रातील खेळाडू, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, गायक यांना टॅग करून मतदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करा, लोकशाही मजबूत बनण्‍यासाठी सहकार्य करा, असे आवाहन केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रातल्या किंवा देशातील महिलांचे मन दुखावले असतील तर…”, अब्दुल सत्तारांची टीकेनंतरची प्रतिक्रिया

Aprna

अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं !

News Desk

अंबाजोगाईतील डीवायएसपींची बदली, तर ग्रामीणचे पीआय सस्पेंड; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna