HW News Marathi
राजकारण

आताचे अन् विधानसभेनंतरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

मुंबई | “देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार”, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. अमित शाह हे आज (२२ सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर आहेत. काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयासंदर्भात अमित शाह यांचे गोरेगावमधील नेस्को संकुलात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (२१ सप्टेंबर) म्हणजे कालच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेची तारीख जाहीर केली. त्यामुळे अमित शहांचा हा कार्यक्रम राज्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या निवडणूक प्रचारातील पहिला कार्यक्रम ठरला. यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना अमित शाह यांनी निवडणुकीनंतर देखील देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

“अनेक जण बोलतात कि असं झालं तर आम्ही जिंकू तसं झालं तर आम्ही जिंकू. मात्र, आता काहीही झालं किंवा काहीही नाही झालं तरीही आमचा विजय हा नक्की आहे”, असे म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधत आपल्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. अमित शाह यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना “महाराष्ट्राचे आताचे आणि विधानसभा निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री”, असा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचेच सरकार स्थापन होईल, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे ?

  • आताचे अन् विधानसभेनंतरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !
  • कुछ भी हो, कुछ भी न हो हमारी जीत पक्की है
  • पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार.
  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात देशात पहिल्या क्रमांकावर आणले.
  • काँग्रेससाठी काश्मीरचा मुद्दा राजकीय असेल पण आमच्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही
  • आमच्या तीन पिढ्यांनी काश्मीरकरिता बलिदान दिले आहे.
  • पंडित नेहरूंच्या चुकीमुळेच पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित राहिला.
  • कलम ३७० हटविण्यास विरोधात करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा.
  • कलम ३७० मुळे काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावला होता.
  • देशाचा प्रश्न असेल तेव्हा राजकारण बाजूला ठेवले पाहिजे.
  • आता काश्मीरमधील काही ठिकाणचे निर्बंध हटविण्यात आले असून काश्मीरमध्ये आता कोणत्याही प्रकारची अशांतता नाही.
  • काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाइट हॅक

News Desk

लोकसभेत शिवसेनेच्या 18 खासदारांना भावना गवळींनी दिलेली व्हिप लागू होणार! – एकनाथ शिंदे

Aprna

मुंबईत काय सुरू आहे !

News Desk