HW News Marathi
राजकारण

प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसला राम राम ठोकण्याच्या तयारीत ? काँग्रेसला मोठा झटका

नवी दिल्ली | काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी लोकसभा निवडणुकांच्या मध्यातच काँग्रेसला मोठा धक्का देण्याची शक्यता आहे. प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेसला राम राम ठोकणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून बायोमधून चक्क आपले काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ते पद हटविले आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी राजीनामा दिला तर काँग्रेसला अत्यंत मोठा झटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रियांका यांनी नुकताच काँग्रेस, काँग्रेसमधील नेत्यांविषयी उघड नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला.

“काँग्रेसमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना महत्व दिले जाते”, अशा शब्दात प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे प्रियांका चतुर्वेदी या सध्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला राम राम ठोकून त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी

प्रियांका चतुर्वेदी यांना काँग्रेसच्या उत्तर मुंबई मतदारसंघाची उमेदवारी हवी होती. मात्र, काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघाची उमेदवारी उर्मिला मातोंडकर यांना देण्यात आली. त्यामुळे देखील प्रियांका चतुर्वेदी पक्षावर नाराज होत्या, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांच्या मथुरा येथील राफेलसंदर्भातील पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रियंकाशी गैरवर्तन केले. याबाबत तक्रार केल्यानंतर दोषी आढळलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले. मात्र, पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी जोतिरादित्य सिंधिया यांनी हस्तक्षेप करत या पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द केले. इतकेच नव्हे तर त्यांना पुन्हा त्यांची पदे देखील दिली. त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाबद्दल प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे बबनराव थोरातांच्या ‘त्या’ चिथावणीखोर वक्तव्यामुळे उदय सामंत यांच्या गाडीवर झाला हल्ला

Aprna

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘पाच’ महत्त्वाच्या योजना

News Desk

“निष्ठावान कलातपस्वी हरपला”; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Chetan Kirdat