HW News Marathi
राजकारण

आजोबांचा अपमान झाला म्हणून सुजयने पक्ष सोडला !

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा दिलेला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच स्वीकारला आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र, राजकीय वर्तुळात राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच पक्षातून देखील बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे आज (२७ एप्रिल) आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद सुरु आहे. ते नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  • राहुल गांधींनी नगरसाठी भांडायला हवे होते
  • बाळासाहेब विखेंबाबत केलेले वक्तव्य वेदनादायी होते
  • आजोबांचा अपमान झाला म्हणून सुजयने पक्ष सोडला
  • मला माझ्या मुलामागे उभे राहावे लागले
  • आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी आम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषद निवडणुकीत अशी आहे मतसंख्या….

News Desk

“मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको,” मुख्यमंत्र्यांचे आदेश

Aprna

राहुल गांधींकडे १५ कोटींची संपत्ती, ७२ लाख रुपयांचे कर्ज, प्रतिज्ञापत्रातील माहिती

News Desk