HW News Marathi
राजकारण

राहुल यांच्या मुंबई दौ-याला सुरुवात

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी ते आज मुंबईमधील भिवंडी येथे न्यायालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता हजर राहणार आहेत. मंगळवारी ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे स्वागत देखील केले.

  • काय आहे प्रकरण

सहा मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत राहुल गांधी यांनी महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

या याचिकेत न्यायालयाकडून आरोप निश्चितीसाठी राहुल गांधी यापूर्वी भिवंडी न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी न्यायालयात त्यांच्या वकिलांनी केवळ वृत्तपत्राच्या कात्रणावरून याचिका दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला, अशी बाजू मांडली होती. त्यामुळे कायदेशीरपणे गुन्ह्याचे स्वरूप उघड होत नसल्याने संपूर्ण कागदपत्र उपलब्ध करावेत, अशीमागणीही न्यायालयाकडे करण्यात आली.

यावेळी हा दावा समरी ट्रायल प्रमाणे न चालवता तो समन्स ट्रायल प्रमाणे चालवावा, या अर्जावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत दोषारोप न्यायालयासमोर मांडले जाणार असून प्रिन्सिपल सिव्हिल जज शेख यांच्याकडे सुनावणी होणार आहे. यामुळे राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी ‘मविआ’ आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

Aprna

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात प्रवेश करणार

Aprna

मुख्यमंत्री इतके तटस्थ आणि स्थितप्रज्ञ कसे काय राहू शकतात?

swarit