HW News Marathi
राजकारण

फोटोसेशनवरून राहुल गांधींची मोदींवर टिका

नवी दिल्ली | मेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून १५ मजूर कोळशाच्या खाणीत अडकले होते. या मजुरांना वाचवण्यासाठी अभियान राबविले गेले आहे. या खाणीतून अद्याप मजुरांना बाहेर काढण्यात यश मिळालेले नाही. या मजुरांचा मुद्द्याचा आधार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी म्हटले की, बचाव कार्यसाठी लागण्यात येणाऱ्या हाय प्रेशर पंपची व्यवस्था करण्यास नकार दिला. तसेच मोदींनी या मजुरांना वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

राहुल यांनी या संपुर्ण प्रकरणाची माहिती ट्विट करून दिली आहे. गेल्या १५ दिवसांपासून खाणीत अडकलेल्या मजूर हे ऑक्सिजनसाठी धडपडत आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी हे बोगीबील सेतूवर कॅमेऱ्यांसमोर पोज देत फिरत आहेत. मोदी सरकारने या मजूरांना वाचविण्यासाठी लागणारे हाय प्रेशर पंपची व्यवस्था करण्यास मनाई केली आहे. सरकारकडून खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचविण्यासाठी उशीराने बचाव कार्य हाती घेतले. मी या सर्व खाणी अडकलेल्या सर्व मजूर सुखरुपपणे बाहेर येण्यासाठी प्रार्थना करत आहे. हे मजूर १३ डिसेंबरपासून या खाणीत अडकलेले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार ‘मुतऱ्या’ तोंडाचे सामनातून टीका

News Desk

सत्तेत आल्यानंतर एका वर्षात देशातील २२ लाख युवकांना सरकारी नोकऱ्या देणार | काँग्रेस

News Desk

काँग्रेसला मोठा धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

Aprna