HW News Marathi
राजकारण

…मग काँग्रेसला महाआघाडी करण्याची गरज का पडते ?

नवी दिल्ली | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु असल्याचे दिसत आहे. आता भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी काँग्रेससह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली आहे. “देशातील महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पहिले जात असताना काँग्रेसला भाजपच्या विरोधात महाआघाडी करण्याची गरज का पडते ?, असा टोला राम माधव यांनी लगावला आहे.

एकीकडे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेसकडून महाआघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे देशातील तीन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राम माधव यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

आता आम्ही नव्या मित्रपक्षांच्या शोधात

भाजप युतीसाठी तडजोड करण्यास तयार असल्याचे संकेत देखील यावेळी राम माधव यांनी दिले आहेत. “राजकारणात आघाडी किंवा युतीबाबत कोणताही निर्णय घेताना तडजोड ही करावीच लागलते. आम्ही आता पूर्व आणि दक्षिण भारतात नव्या मित्र पक्षांचा शोधात आहोत”, असेही राम माधव यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत !

News Desk

हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

swarit

पत्राचाळ प्रकरणात नवीन ट्विस्ट; ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात तत्कालीन कृषीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा उल्लेख

Aprna
मनोरंजन

‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर लाँच

News Desk

मुंबई | शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ‘ठाकरे’ सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच सोहळा आज (डिसेंबर) पार पडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची मुख्य भूमिका साकारणारा नवाजुद्दीन सिद्दिकी यांसह अनेक कलाकारसह राजकीय नेते मंडळी उपस्थित होते.

ठाकरे सिनेमाचा पहिला टीझर काहीच दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला होता. या सिनेमाच्या टीझर लाँचनंतर ट्रेलरमध्ये आपल्याला बाबरी मशिद प्रकरणानंतर उसळलेली दंगल पाहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या डोक्यात स्वतंत्र संघटनेचा आलेला विचार आणि त्यानंतरचा शिवसेनेचा झंझावाती प्रवास, बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्व, मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी, मुंबईत दंगल उसळली असताना.

बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याची रसिकांना आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला प्रतीक्षा होती. परंतु, सिनेमाच्या टीझरमधूनच बाळासाहेबांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार असल्याचे स्पष्ट झाले. हुबेहूब बाळासाहेबांची शैली साकारत नवाजुद्दीनने साऱ्यांची मने जिंकली आहेत. हा सिनेमा २५ जानेवारी २०१९ रोजी हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली.

 

Related posts

व्हॅलेंटाईन-डेच्या आठवड्यात होणार संजय जाधवचा ‘लकी’ रिलीज

News Desk

राज ठाकरे यांची कन्या बॉलवूडमध्ये!

News Desk

KumbhMela 2019 : कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग

News Desk