HW News Marathi
राजकारण

पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात !

नवी दिल्ली | ‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (१७ मे) पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळातील पहिली पत्रकार परिषद घेतली. “देशात असे पहिल्यांदाच होणार आहे कि, आमचे सरकार दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेवर येणार आहे”, असा विश्वास देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे. मात्र, पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली नाहीत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

“पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात”, असे ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच पत्रकार परिषद घेतली. मात्र, यावेळी मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देता एकतर्फी संवाद साधला. पत्रकारांनी मोदींसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीच दिली. इतकेच नव्हे तर “मोदींनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक नाही”, असे स्पष्टीकरण देखील अमित शहांनी दिले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी आता देशभरातील पंतप्रधान मोदींवर सडकून टीका होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रातल्या किंवा देशातील महिलांचे मन दुखावले असतील तर…”, अब्दुल सत्तारांची टीकेनंतरची प्रतिक्रिया

Aprna

चंद्राबाबूंच्या उपोषणादरम्यान एकाची आत्महत्या

News Desk

“…तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि त्यांचे कार्य आम्हाला सतत आठवते”, राऊतांची केंद्र-राज्य सरकारवर टीका

Aprna